Marathi Balakumar Sahitya Sabha, Kolhapur, has invited entries for the 2025 Children's Literature Awards. Authors should submit two copies of eligible books before September 5, 2026.
मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने सन २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट बालसाहित्यकृतींना वार्षिक पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, इच्छुक बालसाहित्यिकांनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी सभेकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आला आहे. यासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या बालसाहित्यकृतींचा विचार करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी कथासंग्रह, कवितासंग्रह, बालकादंबरी, समीक्षा, एकांकिका आणि चरित्र या साहित्यप्रकारांतील पुस्तकांच्या दोन प्रती पाठविण्याचे आवाहन सभेने केले आहे. साहित्यकृती सौ. नसीम जमादार, कार्याध्यक्षा, मराठी बालकुमार साहित्य सभा, तोरस्कर चौक, नावेचा कारखाना, कोल्हापूर या पत्त्यावर ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी पोस्टाने पोहोचतील, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे राहणार आहे.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील (मो. ९८३४३४२१२४), कार्यवाह संजय कळके (मो. ८८८८७३७३८३), उपाध्यक्ष परशराम आंबी (मो. ९४२१२०३७३२) तसेच कार्याध्यक्षा नसीम जमादार (मो. ८२७५९१८७६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे मराठी बालकुमार साहित्य सभेने कळविले आहे.
सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…
कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…
डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…
स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…
विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…