काय चाललयं अवतीभवती

मराठी बालकुमार साहित्य सभेतर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन Best Children’s Literature Awards

मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने सन २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट बालसाहित्यकृतींना वार्षिक पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, इच्छुक बालसाहित्यिकांनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी सभेकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर : मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आला आहे. यासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या बालसाहित्यकृतींचा विचार करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी कथासंग्रह, कवितासंग्रह, बालकादंबरी, समीक्षा, एकांकिका आणि चरित्र या साहित्यप्रकारांतील पुस्तकांच्या दोन प्रती पाठविण्याचे आवाहन सभेने केले आहे. साहित्यकृती सौ. नसीम जमादार, कार्याध्यक्षा, मराठी बालकुमार साहित्य सभा, तोरस्कर चौक, नावेचा कारखाना, कोल्हापूर या पत्त्यावर ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी पोस्टाने पोहोचतील, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील (मो. ९८३४३४२१२४), कार्यवाह संजय कळके (मो. ८८८८७३७३८३), उपाध्यक्ष परशराम आंबी (मो. ९४२१२०३७३२) तसेच कार्याध्यक्षा नसीम जमादार (मो. ८२७५९१८७६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे मराठी बालकुमार साहित्य सभेने कळविले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार नव्या पुस्तकांचे प्रकाशन Dr Milind Joshi Books Launch

मुंबई : लेखक डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार नव्या पुस्तकांचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा विलेपार्ले…

1 day ago

आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर – डॉ. राजन गवस

ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो,…

1 day ago

SIAC च्या CET-2026-27 प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची मुदत वाढवली १० जुलैपर्यंत

२ ऑगस्ट रोजी ऑफलाइन होणार सामायिक प्रवेश परीक्षा मुंबई : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था…

1 day ago

शहाजीराजांपासून विश्वभारतीपर्यंत : भारतीयत्वाचा विस्तार आणि जागतिक मानवतेचा नवा आराखडा New Blueprint for Global Humanity

मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी…

2 days ago

Weather Updates : पावसाचा जोर ओसरणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

2 days ago

मनाचे समर्पण म्हणजेच खरी भक्ती

ज्ञानेश्वर माऊलींच्या नवव्या अध्यायातील ही ओवी भक्तीचा अत्यंत गूढ पण सहज आचरणात आणता येणारा मार्ग…

3 days ago