Matrumandir Trust, Pune invites entries for Sant literature awards. Books on saints published in the last two years can be submitted by August 9. Awards will be presented on November 22.
पुणे : ॥ ॐ ॥ मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्या वतीने संत वाङ्मयाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा संत वाङ्मय पुरस्कार यंदाही देण्यात येणार आहे. संत साहित्यावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे तसेच लेखक, प्रकाशक आणि वाचक यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाते.
संस्थेतर्फे शालेय विद्यार्थी व अध्यापकांना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी अधिकाधिक साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच संत परंपरेवरील लेखनाला चालना मिळावी, या हेतूने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभ मातृमंदिर वर्धापन दिनानिमित्त सौर १ मार्गशीर्ष (२२ नोव्हेंबर) रोजी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (पुणे) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी मागील दोन वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी पुस्तकांचा विचार केला जाणार असून चालू वर्षातील प्रकाशनांचा समावेश केला जाणार नाही. संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य (कथा, कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य) पुरस्कारासाठी पाठविण्यात यावे.
१०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या दोन उत्कृष्ट पुस्तकांना अनुक्रमे रु. ८,००० आणि रु. ६,००० असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्काराच्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम लेखकाला तर ४० टक्के रक्कम प्रकाशकाला दिली जाईल. तसेच १०० पृष्ठांपर्यंतच्या बालसाहित्य प्रकारातील संतकथा, संतचरित्र किंवा संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन पुस्तकांना प्रत्येकी रु. २,००० चे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारासाठी आलेल्या पुस्तकांचे परीक्षण संतसाहित्य क्षेत्रातील तीन ख्यातनाम तज्ज्ञांच्या समितीमार्फत करण्यात येईल आणि त्यानंतर पुरस्कारपात्र पुस्तकांची निवड केली जाईल.
लेखक व प्रकाशकांनी पुरस्कारासाठी प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती सौर २४ श्रावण (९ ऑगस्ट) पर्यंत मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, पुणे – ४११०४४ या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दूरध्वनी : ०२०-२७१६८००० / ७४९९७२०३९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख सु. मा. कुलकर्णी यांनी केले आहे.
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…