विश्वाचे आर्त

उचला साधनेचे गांडिव

मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला मोह नावाचा सखा शत्रूपक्षात असेल, तर तो शत्रू आहे. आपण त्याला मारले नाही तर तो आपणावर विजय संपादन करेल. हे लक्षात घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।।197।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ – सर्वांगावर काटा उभा राहीला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत. आणि गांडिव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे.

साधनेतील मंत्र हे गांडिव आहे. याचा प्रहार करायला हवा. साधनेला आपण बसलेला असतो. पण आपण हे गांडिव उचललेले नसते. साधना सुरू असते. मंत्रोच्चार सुरू असतो. पण मन मात्र कोठेतरी भरकटलेले असते. गांडिव चालवण्याची इच्छा मनात नसेल तर बाण योग्य ठिकाणी लागणार नाही. त्याची जागा चुकणार. त्याचा वार वाया जाणार. यासाठी गांडिव चालविण्याचा दृढ निश्चिय हवा.

मोहामुळे हा धनुष्य उचलण्याची इच्छा नसते. मंत्र म्हणण्यात आपण आपला वेळ फुकट का घालवत आहोत. त्यावेळात आपण अन्य काही तरी कार्य करू शकलो असतो. असे म्हणून आपण तो वेळ दवडतो. साधना करण्याचे विसरूनच जातो. आपण साधना मुळात करतोच किती वेळ. दहा ते पंधरा मिनटे त्यात वेळ घालवला तर तो वाया कसा जातो ? दहा मिनिटे मोलाची आहेत. मग ही दहा मिनिटे साधनेत योग्य प्रकारे घालवली तर वेळ वाया कसा जाईल. पण तसे घडत नाही.

दहा मिनिटे आपण साधनेला बसतो. पण या दहा मिनिटात मनात कोणते विचार करतो यावर लक्ष द्यायला हवे. लक्ष दिल्यानंतर असे लक्षात येते की आपण सोऽहम साधना करतच नाही. साधनेला तर बसलेले असतो. पण मनात दररोजच्या घडामोडी सुरू असतात. मनात अनेक विचार घोळत असतात. त्यातच आपली दहा मिनिटे जातात. मग साधना झालीच नाही. वेळ वायाच गेला ना ? यासाठी साधनेत मन रमवायला हवे. येणारे विचार थांबवायला हवेत. मनात विविध मोहाचे विचार येतात. अशाने साधना होतच नाही. हे विचार आपली पाठच सोडत नाहीत.

साधनेत मंत्राचा गांडिव काही उचललाच जात नाही. उचलला तरी त्यातून सुटलेला बाण योग्य ठिकाणी लागत नाही. तो चुकतो. मनाची एकाग्रता वाढवायला हवी. वेळेचे महत्त्व आपणास पटते ना ? मग वेळ वाया का घालवता ? साधनेत मनाची एकाग्रता हवी. मन एकाग्र झाले नाही तर वेळ फुकट जाणार. हा नफा-तोटा विचारात घ्यायलाच हवा. तरच लाभ होणार आहे. कोणताही धंदा करताना नफा-तोटा पाहावाच लागतो. तरच तो धंदा यशस्वी होतो. अन्यथा कधी तरी तो व्यवसाय गुंडाळावा लागतो.

मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला मोह नावाचा सखा शत्रूपक्षात असेल, तर तो शत्रू आहे. आपण त्याला मारले नाही तर तो आपणावर विजय संपादन करेल. हे लक्षात घ्यायला हवे. मनाला सुटलेला मोह आपणास खाणार आहे. आपला वेळ फुकट घालवणार आहे. हे लक्षात घेऊन साधना जागरूकतेने करायला हवी. सोऽहम मध्ये मन रमवायला हवे. तसा प्रयत्न करायला हवा. तरच त्यातून सुटणारे बाण हे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतील.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गणेशाला आघाडा का प्रिय? अपामार्गाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व Ganesha favorite plants

गणेश पूजेदरम्यान आघाड्याची पाने वाहताना "ॐ गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि" हा मंत्र म्हटला जातो. अपामार्ग'…

11 hours ago

‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

झाडीपट्टीच्या रंगभूमीवर गाजलेली क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची शौर्यगाथा आता विद्यापीठाच्या वर्गखोलीत पोहोचणार आहे. नाटककार चुडाराम…

22 hours ago

श्रीगणेशाला शमीपत्र का प्रिय? पौराणिक कथेसह आयुर्वेदातील महत्त्व

शमी पत्र श्रीगणेशाला अतिशय प्रिय आहे. गणेशोत्सवात गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ विविध प्रकारच्या पानांमध्ये, शमी…

23 hours ago

पन्नास वर्षे इतिहासाच्या सत्याचा शोध! गजानन मेहेंदळे यांच्या संशोधनतपस्येचा विलक्षण वारसा

१७ सप्टेंबर २०२६.प्रथम पुण्यस्मरण वर्षदिन.गजानन भास्कर मेहेंदळे: एक ऋषितुल्य इतिहास संशोधक ! https://www.youtube.com/embed/_djMeJxR9pg इतिहास केवळ…

1 day ago

आकाशालाच माहीत असते त्याचा विस्तार; मग माणसाला स्वतःची ओळख कधी होते?

आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून मोजत राहतो—यश, अपयश, मान, प्रतिष्ठा आणि परिस्थितीच्या तराजूत! पण आपल्या अस्तित्वाची…

1 day ago

हातात येणारे पैसे आज आनंद देतील; पण उद्या त्याची किंमत कोण मोजणार?

रोख हस्तांतरण योजनांची मोठी राजकीय किंमत ! विशेष आर्थिक लेख देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर…

2 days ago