Mumbai Marathi Literary Sangh invites submission of literary works for award
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
मुंबई – येथील मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली आहे.
साहित्य संघातर्फे नीलिमा भावे पुरस्कृत ‘रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, कथाकाराच्या पहिल्या कथासंग्रहास कथाकार शांताराम पुरस्कार तर चंद्रगिरी पुरस्कार प्रवास वर्णनासाठी दिला जातो. या तीनही पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. या व्यतिरिक्त साहित्य संघातर्फे मिलिंद गाडगीळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बालसाहित्य पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. सर्व पुरस्कार साहित्य संघाच्या वर्धापनदिनी ऑक्टोबरमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
या चार पुरस्कारांच्या विचारार्थ १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावयाच्या आहेत. अधिक माहितीसाठी दुपारी २ ते ८ या वेळेत ७३०४३ ६९३९६ या नंबरवर संपर्क साधावा.
पुस्तके पाठविण्याचा पत्ताः
अशोक बेंडखळे
कार्यवाह- साहित्य शाखा
मुंबई मराठी साहित्य संघ,
४था मजला, डॅा. भालेराव मार्ग,
गिरगांव, मुंबई ४००००४
भ्र. ७३०४३ ६९३९६ ( दु.२ ते ८)
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…