काय चाललयं अवतीभवती

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई – येथील मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली आहे.

साहित्य संघातर्फे नीलिमा भावे पुरस्कृत ‘रा. भि. जोशी वैचारिक साहित्य पुरस्कार, कथाकाराच्या पहिल्या कथासंग्रहास कथाकार शांताराम पुरस्कार तर चंद्रगिरी पुरस्कार प्रवास वर्णनासाठी दिला जातो. या तीनही पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. या व्यतिरिक्त साहित्य संघातर्फे मिलिंद गाडगीळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बालसाहित्य पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे आहे. सर्व पुरस्कार साहित्य संघाच्या वर्धापनदिनी ऑक्टोबरमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

या चार पुरस्कारांच्या विचारार्थ १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावयाच्या आहेत. अधिक माहितीसाठी दुपारी २ ते ८ या वेळेत ७३०४३ ६९३९६ या नंबरवर संपर्क साधावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ताः

अशोक बेंडखळे
कार्यवाह- साहित्य शाखा
मुंबई मराठी साहित्य संघ,
४था मजला, डॅा. भालेराव मार्ग,
गिरगांव, मुंबई ४००००४
भ्र. ७३०४३ ६९३९६ ( दु.२ ते ८)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

4 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

5 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

14 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago