शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दुग्धव्यवसायाच्या बाबतीत आत्मनिर्भर भारत

नवी दिल्‍ली – दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर असून जागतिक पातळीवरील एकूण दूध उत्पादनाच्या 25% दूध भारतात उत्पादित होते. गेल्या 9 वर्षांत भारतातील दूध उत्पादन वार्षिक  6% दराने वाढत आहे आणि देशातील दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता 459 ग्रॅम्स असून दुधाची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या बाबतीत आपला देश स्वावलंबी आहे.

यासंदर्भात सरकारने विविध पावले उचलली असून, पशुपालनविषयक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी (एएचआयडीएफ) ही त्यापैकीच एक योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियान उत्तेजन पॅकेज अंतर्गत केंद्रीय पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 24 जून 2020 रोजी या महत्त्वाच्या सरकारी योजनेची सुरुवात केली. आता या योजनेमधील दूध प्रक्रिया पायाभूत सुविधा निधी(डीआयडीएफ)च्या विलीनीकरणासह योजनेची पुनर्रचना करण्यात आली असून 29110.25 कोटी रुपयांच्या निधीसह या योजनेचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.

देशांतर्गत दुग्धव्यवसाय क्षेत्राचा वाटा वाढवण्याच्या तसेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचे योगदान सुधारण्यात मदत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पशुपालन आणि दुग्धव्यवसाय (डीएएचडी) विभागाच्या वतीने खालील योजना राबवण्यात येत आहेत: –

  1. राष्ट्रीय गोकुळ अभियान:- गाईगुरांच्या स्वदेशी वाणांचे संवर्धन आणि विकास, पशुसंख्येचे जनुकीय अद्ययावतीकरण तसेच जनावरांची दूध उत्पादन क्षमता तसेच उत्पादकता यांच्यात वाढ करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
  2. दुग्धव्यवसाय विकासासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम:- दूध तसेच दुग्धजन्य उत्पादनांची गुणवत्ता सुधारणे आणि संघटीत दूध खरेदीचे प्रमाण वाढवणे.
  3. पशुसंवर्धनविषयक पायाभूत सुविधा विकास निधी:- दूध प्रक्रिया आणि मूल्यवर्धनविषयक पायाभूत सुविधा निर्मिती / आधुनिकीकरण करण्यासह इतर तत्सम कार्ये.
  4. दुग्धव्यवसायात सहभागी असलेल्या दूध सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादक संघटना यांना मदत:- खेळत्या  भांडवली कर्जाच्या व्याजावरील सवलतीच्या रुपात पाठबळ पुरवणे.

याशिवाय, सरकारने  पशुपालन आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही  त्यांच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडीट कार्डची (केसीसी) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

8 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

20 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago