विश्वाचे आर्त

चित्तात सद्गुरुंची नित्य अनुभुती हाच प्रसाद

दुःखाने अस्वस्थ झालेली व्यक्ती देवधर्माकडे वळते तसेच योग्य सल्ला देणाऱ्या सद्गुरुंच्या शोधात असते. मन इतरत्र गुंतवून दुःखाला सामोरे जाण्याचा या प्रयत्न असतो. सकारात्मक विचार ठेवून दुःखावर मात त्यांना करायची असते. खरेतर हा देव, हे सद्गुरु आपल्या हृदयातच आहेत. आपल्यातील देवाला, सद्गुरुंना आपण कधी जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण आपणाला त्याची जाणीवच होत नाही. ही जाणीव करून घेऊन त्यांची नित्य अनुभुती घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया ।
तरसील माझिया । प्रसादास्तव ।। १२७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईटगतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील.

संसारात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग घडत असतात. त्याचा त्रास आपणास होत असतो. कधी कधी हा त्रास विकोपालाही जातो. असे नाही की फक्त गरीबांनाच दुःख असते. श्रीमंतानाही दुःख होत असते. रात्री झोप लागत नाही हे सुद्धा एक दुःखच आहे. सुखापेक्षा दुःखाचे प्रसंग जीवनात अधिक असतात तेव्हा ते आव्हान म्हणून स्वीकारायचे असते. दुःख हे रोजचे रडगाणे असते. सुख मात्र कधीतरीच होत असते. यासाठी सुखाच्या क्षणाचा आनंद घेऊन त्यात डुंबायचे असते अन् नित्य असणाऱ्या दुःखाला विसरायचे असते. तरच जीवनात यशस्वी होता येते.

दुःखाने अस्वस्थ झालेली व्यक्ती देवधर्माकडे वळते तसेच योग्य सल्ला देणाऱ्या सद्गुरुंच्या शोधात असते. मन इतरत्र गुंतवून दुःखाला सामोरे जाण्याचा या प्रयत्न असतो. सकारात्मक विचार ठेवून दुःखावर मात त्यांना करायची असते. खरेतर हा देव, हे सद्गुरु आपल्या हृदयातच आहेत. आपल्यातील देवाला, सद्गुरुंना आपण कधी जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण आपणाला त्याची जाणीवच होत नाही. ही जाणीव करून घेऊन त्यांची नित्य अनुभुती घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. म्हणजे आपले जीवनच बदलून जाईल. देवाचा खरा प्रसाद, सद्गुरुंचा खरा प्रसाद कोणता आहे हे जाणून घ्यायला हवे. सद्गुरुंची नित्य अनुभुती हाच सद्गुरुंचा खरा प्रसाद आहे. त्यांच्या विचाराने चित्त भरून जाणे. त्यांचे नित्य अस्तित्व जाणणे, अनुभवने यातूनच सगळे दुःख दूर होते. जे घडले ते त्यांच्यामुळे घडते अन् जे घडणार आहे हे सुद्धा त्यांच्यामुळे घडते. आपण फक्त निमित्तमात्र आहोत. ही अनुभुती घेऊन जीवन जगत राहील्यास दुःख हे कशाचेच होणार नाही. जीवनाचा खरा आनंद आपणाला उपभोगता येईल.

एखादी वाईट घटना घडली किंवा नको असलेली घटना घडली तरी दुःखी व्हायचे नाही. त्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने, विचाराने पाहून यावर मात करायची असते. यात गुंतून पडायचे नाही. म्हणजे याचा त्रास आपणाला होत नाही. त्या घटनेत सद्गुरुंना पाहायचे. ती अनुभुती घेऊन त्यातून आपण अलिप्त व्हायचे. सद्गुरुंनीच घडवले आहे, मग आता तेच मार्ग सुचवतील असे समजून त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. म्हणजे त्याच्या नित्यतेच्या प्रसादाने आपण दुःखापासून मुक्त होतो. त्यांचा हा प्रसादच आपणास या संसाराच्या रहाटगाडग्यातून मुक्त करतो हा विश्वास आपण ठेवायला हवा. चित्तात सद्गुरुंची नित्यता ह्या त्यांच्या प्रसादामुळेच आपले जीवन सुसह्य होते. सुखी होते. यासाठीच नित्य त्यांचे स्मरण ठेवायला हवे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट: द अल्टिमेट इन्व्हेस्टर… गोष्ट जन्मजन्मांतरीची

संपत्तीची शाश्वत वाढ आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. आजच्या टोकाच्या अनिश्चिततेच्या जगात तर ती जास्तच तीव्रतेनं…

10 hours ago

गणेशाला आघाडा का प्रिय? अपामार्गाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व Ganesha favorite plants

गणेश पूजेदरम्यान आघाड्याची पाने वाहताना "ॐ गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि" हा मंत्र म्हटला जातो. अपामार्ग'…

23 hours ago

‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

झाडीपट्टीच्या रंगभूमीवर गाजलेली क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची शौर्यगाथा आता विद्यापीठाच्या वर्गखोलीत पोहोचणार आहे. नाटककार चुडाराम…

1 day ago

श्रीगणेशाला शमीपत्र का प्रिय? पौराणिक कथेसह आयुर्वेदातील महत्त्व

शमी पत्र श्रीगणेशाला अतिशय प्रिय आहे. गणेशोत्सवात गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ विविध प्रकारच्या पानांमध्ये, शमी…

1 day ago

पन्नास वर्षे इतिहासाच्या सत्याचा शोध! गजानन मेहेंदळे यांच्या संशोधनतपस्येचा विलक्षण वारसा

१७ सप्टेंबर २०२६.प्रथम पुण्यस्मरण वर्षदिन.गजानन भास्कर मेहेंदळे: एक ऋषितुल्य इतिहास संशोधक ! https://www.youtube.com/embed/_djMeJxR9pg इतिहास केवळ…

2 days ago

आकाशालाच माहीत असते त्याचा विस्तार; मग माणसाला स्वतःची ओळख कधी होते?

आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून मोजत राहतो—यश, अपयश, मान, प्रतिष्ठा आणि परिस्थितीच्या तराजूत! पण आपल्या अस्तित्वाची…

2 days ago