स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते असे प्रतिपादन भाषांतरकार रघू मिश्रा यांनी केले ते शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्‍या भाषांतरकारांच्‍या राष्‍ट्रीय परिषदेच्‍या समारोप प्रसंगी प्रमुख पाहूणे म्‍हणून बोलत होते.  पुढे ते म्‍हणाले, भाषांतरामुळे सांस्‍कृतिक आदान-प्रदान केले जाते तसेच परस्‍परसंबंध  अधिक सौहार्द केले जातात यासाठी अनुवादकांनी काळजीपूर्वक अनुवाद केला पाहिजे. या समारंभासाठी अध्‍यक्ष डॉ. अवनीश पाटील यांनी वाङ्मयीन भाषांतराबरोबर ऐतिहासिक आणि पूरातत्‍व कागदपत्रांचे भाषांतर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. भारतीय अनुवाद साहित्‍य भूवनेश्‍वर चे सचिव सरत आचार्य यांनी या परिषदेची फलश्रुती आपल्‍या मनोगतातून व्‍यक्‍त केली.   

दोन दिवस चाललेल्‍या या परिषदेमध्‍ये भारतातील ५०हून अधिक भाषांतरकार सहभागी झाले होते. या परिषदेमध्‍ये भाषांतराची प्रक्रिया, इतिहास, फलश्रृती आणि भाषांतराची प्रक्रियेतील गुंते या मुद्यांच्‍या अनुषंगाने चर्चा झाली. आजच्‍या सत्रात कृष्‍णा गुडो (आसाम), श्रीरंजन आवटे (पुणे), डॉ. नितीन जरंडीकर (कोल्‍हापूर), गणेश विसपूते (पुणे), प्रवासिनी महाकुड (ओरिसा), सोनाली नवांगुळ (कोल्‍हापूर), शरद आचार्य (भूवनेश्‍वर), सबिता रौत (ओरिसा), बासीरन बीबी(ओरिसा), गोरख थोरात (पुणे), पेरूमल किट्टूस्‍वामी (तंजावर), मिता दास (प. बंगाल), मंजुळा मोहंती (ओरिसा), कविता गोस्‍वामी (ओरिसा), रघूनाथ कडाकणे (कोल्‍हापूर), धनंजय देवळालकर (कोल्‍हापूर), अजय वर्मा (म्‍हैसूर), बिजया प्रधान (ओरिसा) इत्‍यादी भाषांतरकारांनी सहभाग घेतला.

प्रास्‍ताविक प्रा. मेघा पानसरे यांनी केले तर आभार डॉ. रणधीर शिंदे यांनी मानले. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. राजश्री बारवेकर, विद्यापीठातील विविध अधिविभागातील प्राध्‍यापक तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्‍यापक, अनुवादक व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

5 minutes ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

5 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago