विश्वाचे आर्त

श्रेष्ठ भक्त कोणास म्हणावे ?

सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायच्या, याबाबत मागदर्शनही करीत असतात; पण सद्गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्ती दृढ व्हावी, हा असतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 9011087406

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानी ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ – याप्रमाणें जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो.

संतांकडे अनेक जण जात असतात. प्रत्येकाचा भक्तीचा, श्रद्धेचा मार्ग वेगळा असतो. कोण स्वतःच्या घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संतांकडे जात असतो, तर कोण विविध कामे मिळावीत, या आशेने जात असतो. सद्गुरूंच्या दर्शनाने आपले कष्ट दूर होतात, समस्या सुटतात, असा त्यांचा समज असतो. सद्गुरूंचे उपदेश ते घेत असतात. यामुळे त्यांची प्रगती होते. साहजिकच भक्ती दृढ होते. विश्वास वाढतो.

सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायच्या, याबाबत मागदर्शनही करीत असतात; पण सद्गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्ती दृढ व्हावी, हा असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिक प्रगतीही आवश्यक आहे. संसार आणि परमार्थ एकाच वेळी करत असताना भक्ताची भौतिक प्रगती असेल, तरच त्याचे मन अध्यात्मात रमेल, हे सद्गुरूंना माहीत असते; पण अनेक भक्तांचा तसेच व्यक्तींचा याबाबत गैरसमज असतो.

अनेक व्यक्ती या भौतिक सुखासाठीच सद्गुरूंचा वापर करून घेतात. अशा वेळी त्यांच्यातील अहंकार जागृत झाला तर मात्र भक्ती संपते. यासाठी सद्गुरू भक्ताला भौतिक प्रगतीसाठी मदत का करतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. सद्गुरूंचा श्रेष्ठ भक्त कसे होता येते, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्गुरू श्रेष्ठ भक्त कोणास समजतात, हे समजून घ्यायलाच हवे.

सद्गुरूंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्य युक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्गुरू समजतात. जे भक्त सद्गुरूंना आपला आत्मभाव देतात, त्यांनाच सद्गुरू श्रेष्ठ भक्त मानतात. यासाठी सद्गुरूंच्याकडे आत्मज्ञानी होण्यासाठी जावे. भौतिक प्रगतीसाठी सद्गुरूंचा वापर करणे योग्य नाही. आध्यात्मिक प्रगतीसाठीच सद्गुरू आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

1 day ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

3 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

3 days ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

3 days ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

3 days ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

3 days ago