Return rains are currently in place while Maharashtra is likely to be partly cloudy from tomorrow
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495
परतीचा पाऊस सध्या जागेवरच तर महाराष्ट्रात उद्यापासून काहीसा उघडीपीकडे कल
१-पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
उद्या शनिवार ( दि. २८ सप्टेंबरपासून ) आठवडाभर म्हणजे शनिवार ( दि. ५ ऑक्टोबर) पर्यन्त खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अश्या १८ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असु शकते. मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यात मात्र अश्या प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही १ ते ५ ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते असे वाटते.
२-पुर परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता.
येत्या तीन दिवसात कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या ७ जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अश्या ६ जिल्ह्यात अश्या एकूण १३ जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मात्र पूरपाण्याची तीव्रता वाढू शकते, असे वाटते.
३. ऑक्टोबरमधील पाऊस
सहा ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून १३ ऑक्टोबर पर्यन्त म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
४.मान्सूनचे निर्गमन
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ ऑक्टोबर नंतर मान्सून केंव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
मानवतेचा नवा आराखडा "इतिहास म्हणजे केवळ काळाच्या उदरात गडप झालेल्या घटनांचा पडसाद नसून, तो भविष्यासाठी…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
ज्ञानेश्वर माऊलींच्या नवव्या अध्यायातील ही ओवी भक्तीचा अत्यंत गूढ पण सहज आचरणात आणता येणारा मार्ग…
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी…
गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…
भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…