शेतकऱ्यांचे उत्पन्न दसपट झाल्याचा केंद्रीय कृषिमंत्री दावा करतात. परंतु शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मारण्याचे काम कसे होत आहे हे एका गव्हाचे उदाहरण देऊन सिद्ध करीत आहे. हे इतर सर्व पिकांनाही लागू आहे.

सतीश देशमुख,
B.E. (Mech), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518
  1. सन 2022- 23 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्राला शिफारस केलेली गव्हाची किंमत 3755 रुपये प्रति क्विंटल होती. पण केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत (MSP) 2015 रु. प्रति क्विंटल जाहीर केली. म्हणजे 46.3 टक्के कमी.
    स्वामीनाथन शिफारसी प्रमाणे 50 टक्के नफा वाढवायचे तर दूरच राहिले.
  2. सन 2023 – 24 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेला गव्हाचा हमीभाव आहे 2125 रु. प्रति क्विंटल. म्हणजे इतर शेतीच्या निविष्ठाचे दर, उत्पादन खर्चमहागाई भरमसाठ वाढत असताना फक्त 1 रुपया 10 पैसे प्रति किलो वाढ केली.
  3. युक्रेन -रशिया युद्ध, रुपयाचे अवमूल्यन व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गव्हाचे भाव चांगलेच वाढले असताना केंद्र सरकारने गव्हाला निर्यात बंदी घातली व दर पाडले.
  4. उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त मिळावा व शहरातील लाडवलेल्या ग्राहकांच्या लांगूनचालनासाठी हे केले.
  5. काही राज्यांमध्ये निवडणुका जवळ आल्यामुळे नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्याकडील 30 लाख टन गहु 2150 रुपये प्रति क्विंटलने विक्रीसाठी बाजारामध्ये आणला आहे. त्यामुळे गव्हाचे दर 500 रुपयांनी कोसळले.
  6. सेबीने गव्हा सकट इतर आठ शेतमालांवर वायदे बंदी करून अजून भाव पाडले.
  7. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत होणाऱ्या व्यवहारांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळेही शेतमालाचे भाव निच्चांकी होतात.
  8. दुर्दैव असे की विरोधी पक्षही महागाई विरुद्ध आंदोलन करताना शेतमालाच्या भावाबद्दल बोलत असतात.
  9. तुमची महागाईची परिभाषा आहे तरी काय?
    सन 1973 मध्ये डिझेल 84 पैसे प्रती लिटर असताना गहु एक रुपया प्रति किलो होता. म्हणजे डिझेलचे भाव 16 टक्क्यांनी कमी होते. आज डिझेल 100 रुपये असताना गव्हाचा हमी भाव 21.25 रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच आज डिझेलचे भाव गव्हाच्या तुलनेत जवळपास पाचपट पटीने वाढले आहेत.

कुठे आहे शेतमालाची महागाई?

सोबतः कार्टून

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

13 hours ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

15 hours ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

15 hours ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

19 hours ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

1 day ago

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

2 days ago