काय चाललयं अवतीभवती

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरिय काव्यपुरस्कार देण्यात येतात. यासाठी कविता संग्रह पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

२०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठानच्या वतिने पसायदान राज्यस्तरिय काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. कविता संग्रहासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कविता संग्रहासाठी विषयाचे बंधन नाही. मान्यवर समीक्षकांच्या समितीद्वारा योग्य दोन कविता संग्रहाची निवड केली जाते.

प्रत्येकी ३००० रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कारप्राप्त दोन कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. तरी १ जानेवारी२०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या स्वरचित कविता संग्रहाच्या दोन प्रती १०मार्च २०२३ पर्यंत पाठवाव्यात.

पुस्तकाच्या प्रती संयोजक, पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यानावे ईश्वरचंद्र हलगरे, ‘जय जवान’ व्याघ्रांबरी देवळाच्या समोर, देवपाट, गुहागर ता. गुहागर जि. रत्नागिरी 415703
संपर्क 94041 61180 या पत्त्यावर पाठवाव्यात.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

9 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

13 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

4 days ago