Shahu Maharaj Memory article by Raosaheb Pujari
कोल्हापूर सारख्या संस्थानाच्या राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी दुसऱ्या दिवशी संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. राजर्षी शाहूंचा पहिला समारंभ होता. याप्रसंगी शाहू महाराजांनी चांदीचे खोरे वापरून कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या कार्यास प्रारंभ केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज महोत्सवानिमित्त या इतिहासाचा घेतलेला आढावा…
संपादक, शेतीप्रगती मासिक
कोल्हापूर रेल्वे राजर्षी शाहूंचा पहिला जाहीर समारंभभारतात कार्यक्षम प्रशासनासाठी 1849 साली पहिल्यादा रेल्वे सेवा सुरू झाली जी.आय.पी. रेल्वे म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने ही जबाबदारी घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी ब्रिटीश सरकारने दौंड, पुणे येथून एक रेल्वेमार्ग सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, हुबळी, बंगळूरला जोडण्याची योजना तयार केली. कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्ग योजना मुंबई सरकारने फेब्रुवारी, १८७९ मध्ये मंजूर केली. हे काम लवकर पूर्ण करण्याचा संकल्प कोल्हापूर संस्थानच्या कौन्सिल आफ ॲडमिनीस्ट्रेशन यांनी घेतला. तेव्हा कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे जनक पिता जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे होते. या रेल्वे मार्गाची पायाभरणी हा राजर्षी शाहू यांच्या कार्यकिर्दीतील पहिला जाहीर समारंभ होता. कोल्हापूर सारख्या संस्थानाच्या राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी दुसऱ्या दिवशी संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. राजर्षी शाहूंचा पहिला समारंभ होता. याप्रसंगी शाहू महाराजांनी चांदीचे खोरे वापरून कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या कार्यास प्रारंभ केला.
भाषणात ते म्हणाले, सर्व लोकांच्या संबंधीचे काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. त्या कामी आपण मला मेहेरबानी करीत आहात. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जे थोडेबहुत शब्द बोलण्यास मला सुचविले आहे, ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याची संपती साधने वाढण्याच्या कामी त्यांचा फायदेशीर परिणाम होईल, अशी माझे उमेद आहे, की साहजिक रीतीने घडून येणाऱ्या क्रमाप्रमाणे आजपासून तीन वर्षाच्या आत हा आगगाडीचा रस्ता करण्याचे काम माझ्या हातून होईल. कोल्हापूर स्टेट रेल्वे प्रकल्पाचे ४८ किलोमीटर म्हणजे २८ मैल लांबीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरूवारी ३ मे, १८८८ ला सायंकाळी साडेपाचला शाहूपुरीतील माळरानावर म्हणजेच सध्याच्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी झाले. कार्यक्रमास खास निमंत्रित म्हणुन युरोपियन अधिकारी, संस्थानचे मानकरी, अधिकारी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रेल्वे प्रकल्पाचा प्राथमिक खर्चाचा अंदाज २२ लाख ७५ हजार रूपये होता. रेल्वेमार्ग बांधणीसाठी मुख्य अभियंता म्हणून आर. जे. शानन यांची कोल्हापूर संस्थानने नेमणूक केली आणि कोल्हापूर स्टेट रेल्वे नावाने ही योजना आखली गेली.प्राथमिक अंदाजाप्रमाणे तीन वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर ते मिरज हा २८.३/४ मैलाचा म्हणजे ४८ किलोमीटरचा मार्ग बांधण्यात कोल्हापूर दरबारने यश मिळविले. पंचगंगा आणि कृष्णा नदीवरचे छोटे-मोठे पूल व मोऱ्या यांची संख्या ७५ वर गेली. प्रकल्प तीन वर्षात पुर्णत्वास गेला. यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतोय, याचेच सगळ्यांना अप्रुप होते. या रेल्वेमार्गासाठी सुरवातीस लाकडी स्लिपर वापरण्याचे ठरविले होते. पण नंतर लोखंडी स्लिपरचा वापरण्याचे ठरले. त्यामुळे वाढीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक ठरले. अपेक्षित खर्च २२ लाख ७२ हजार २५० रूपयांवरून २३ लाख ५ हजार १२३ रूपयांपर्यंत वाढला. पण राजर्षी शाहू महाराजांची आपल्या संस्थानच्या विकासाविषयीची तळमळ व महत्त्वाकांक्षा यामुळे हे मोठे कार्य निर्विघ्नपणे पार पाडले. या कार्यासाठी मिरजेच्या राजेसाहेबांची हद्द कृष्णा नदीपर्यंत होती. हा मार्ग त्यांच्या अखत्यारीत असूनही त्यांनी या कामी संस्थानकाला सक्रिया सहकार्य केले.कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर सुरूवातीला रूकडी, हातकणंगले व उदगाव ही स्थानके होती. उदगाव स्थानकाचे कालांतराने नामकरण शिरोळ रोड झाले. त्यानंतर १९१७ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपले जनकपिता जयसिंगराव यांच्या स्मृतिनिमित्त जयसिंगपूर स्थापन केले. त्यानंतर जयसिंगपूर रेल्वे स्थानक असे नामांतर झाले. रूकडीजवळ पंचगंगा नदीवर पंचगंगा नदीवर, तसेच उदगावनजीक कृष्णा नदीवर दोन मोठे पूल बांधले गेले.
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…