विश्वाचे आर्त

उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

देखे रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसे ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा

ओवीचा अर्थ – हें पाहा, रोग हटविण्याकरितां औषध तर घ्यावें, पण तें औषध ज्याप्रमाणें, अतिशय रुचकर आणि गोड असावें.

औषध गोड नसते. ते कडू असते, पण त्याचा परिणाम हा मधुर असतो. सल्ला हा औषधासारखा असतो. तो गोड कधीही वाटत नाही. तो मनाला पटतही नाही, पण हा कडवटपणा आपणास स्वीकारावा लागतो. तो स्वीकारल्यानंतर अनुभव हे गोड असतात. जीवनात अनेक कठीण प्रसंगीही असेच अनुभव येतात. उतारवयात मात्र बऱ्याचदा शरीर औषधांना साथ देत नाही. त्यावेळी डॉक्टर आपल्या शरीराची प्रयोगशाळाच करतात. विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात. शरीराला साथ देणारी औषधेच घ्यावी लागतात. तरच त्याचा परिणाम दिसून येतो.

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते. देहबोली, हालचालींध्येही फरक असतो. पोरकटपणा कमी होतो. तारुण्यात पेटून उठणारे मन मात्र इथे शांतपणे मार्ग निवडत असते. त्यावर योग्य उपाय योजत असते. हा बदल वयोमानानुसार होतो. तरुणपणी सल्ले मनाला रुचत नाहीत, पण हे सल्ले स्वीकारावे लागतात. त्याचा योग्य परिणामही दिसून येतो. उतारवयात मात्र मन हे सल्ले स्वीकारण्यास पटकन् तयार होत नाही. बळजबरीने ते स्वीकारले जातात. त्यामुळे याचा परिणाम फारसा चांगला दिसून येत नाही.

कित्येकदा काही सल्ले मनाला न पटल्याने स्वभाव चिडचिडा होतो. हे शरीर गुणधर्म आहेत, पण शरीर निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत. सर्व रोग हे मनात दडलेले असतात. मन शांत असेल तर हे सर्व रोग शांत असतात. मनाची चलबिचलता सुरू झाली की रोगांचीही चलबिचलता सुरू होते. हळूहळू रोग डोके वर काढतात. यासाठी मनाची स्थिरता ही महत्त्वाची आहे. मन स्थिर ठेवणे हे रोगावर सर्वात मोठे औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही. मनाच्या स्थिरतेसाठी सांगितलेले उपाय यासाठी योजने गरजेचे आहे. उतारवयात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे सर्वात उपयुक्त असे औषध आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गणेशाला करवीर म्हणजेच कण्हेर का प्रिय आहे?

गणेशाला प्रिय करवीर : धार्मिक श्रद्धेसोबत आयुर्वेदातील महत्त्व गणरायाला प्रिय असलेल्या फुलांमध्ये कण्हेर अर्थात करवीराचे…

3 hours ago

साखरेबाबत मोठा निर्णय; घाऊक साठवणुकीची मर्यादा 30 दिवसांवर

साखरेचा घाऊक साठा करणाऱ्या ग्राहकांसाठी, साठा करण्याची मर्यादा, 15 दिवसांवरुन 30 दिवसांपर्यंत शिथिल करण्याचा सरकारचा…

6 hours ago

मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळीच्या चौथ्या परिषदेत शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील दोन विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेचे विद्यार्थी वैभव कदम आणि प्राजक्ता डवरी…

7 hours ago

जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट: द अल्टिमेट इन्व्हेस्टर… गोष्ट जन्मजन्मांतरीची

संपत्तीची शाश्वत वाढ आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. आजच्या टोकाच्या अनिश्चिततेच्या जगात तर ती जास्तच तीव्रतेनं…

19 hours ago

गणेशाला आघाडा का प्रिय? अपामार्गाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व Ganesha favorite plants

गणेश पूजेदरम्यान आघाड्याची पाने वाहताना "ॐ गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि" हा मंत्र म्हटला जातो. अपामार्ग'…

1 day ago

‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

झाडीपट्टीच्या रंगभूमीवर गाजलेली क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची शौर्यगाथा आता विद्यापीठाच्या वर्गखोलीत पोहोचणार आहे. नाटककार चुडाराम…

2 days ago