Student participation is essential in biodiversity conservation SR Yadav
कोल्हापूर ः जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, प्रा. एस. आर. यादव यांनी काढले.
न्यू कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागामार्फत ‘जैवविविधता संवर्धन’ विषयावर एकदिवसीय व्याख्यान मालिका आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानादरम्यान शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विषयाचे नामवंत प्रा यादव यांनी उद्गार काढले.
या व्याख्यानादरम्यान त्यांनी भारतातील विविध प्रदेशातील, विविध दुर्मिळ वनस्पतींची माहिती दिली व त्यांच्या संवर्धनाबाबत महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले. मुलांनी याच वयात निसर्ग संवर्धनासाठी झोकून देऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
व्याख्यानासाठी वनस्पतीशास्त्र विषयाची शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख डॉ विनोद शिंपले यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ निलेश पवार यांनी मानले. कार्यक्रम आयोजनास प्राचार्य डॉ व्ही एम पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ एम बी वाघमारे, डॉ सागर देशमुख व इतर सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…