The Maharashtra State Women’s Commission has extended photographer Sandesh Bhandare’s “Ujedachya Vata” women-themed photo exhibition at Ravindra Natya Mandir Art Gallery till 12 March 2026.
प्रदर्शनाला मुदतवाढ
मंगळवार १० आणि बुधवार ११ मार्च रोजी हे प्रदर्शन खुले राहील. महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे भरवण्यात आलेले प्रसिद्ध छायाचित्रकार, अभ्यासक, लेखक संदेश भंडारे यांच्या “उजेडाच्या वाटा “या महिलांविषयीच्या छायाचित्र प्रदर्शनाला १२ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . पु .ल .देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या- रवींद्र नाट्यगृह, कलादालनात पाच ते आठ मार्च दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
उजेडाच्या वाटेवर
कधी स्वतः प्रकाश होऊन,
कधी पावला पुरत्या प्रकाशात हळूहळू पुढे पुढे जाणाऱ्या,
कधी अख्खी वाट उजेडात भरून टाकणाऱ्या, या सगळ्या जणी,
आमच्या अवतीभवती आहेत.
समाजात निम्म्या संख्येने असलेल्या स्त्रियांचा हा अवकाश,
त्यांच्या कामाचा कष्टांचा, स्वप्नांचा आणि
जाणिवांचा परिघ काळाबरोबरच विस्तारत आहे.
स्त्रीचे स्थान काळानुरूप बदलत आहे.
प्रत्यक्ष जीवनात रोजच्या वर्तनातून ते प्रतिबिंबित होत राहते.
छायाचित्रणाच्या माध्यमातून कलाकाराला दिसलेले
स्त्री जीवनाचे वेगवेगळे पैलू
सामाजिक दृष्ट्या उलगडत जातात.
ही छायाचित्रे पाहताना
सहजरित्या दिसणाऱ्या गोष्टींचे गर्भित अर्थ
प्रेक्षकांच्या मनात उमटत उमटावेत आणि
कित्येक गृहीत धरलेल्या गोष्टींमधील धारणा
या निमित्ताने लख्ख दिसून यावी,
हाच आमचा हेतू आहे.
स्त्रियांच्या क्षमतांविषयीचे समज मोडणारी,
कामातील तिची असोशी दाखवणारी,
तिच्या पारंपरिक भूमिकांना छेद देणारी,
त्याचबरोबर पारंपरिक भूमिकांचे महत्त्व सांगणारी,
तिचा सामाजिक स्तर दाखवणारी,
जिद्द दाखवणारी,
ही छायाचित्रे...
प्रेक्षकांचा आणि समाजाचा
स्त्रीविषयक दृष्टिकोन सुदृढ करणारे हे प्रदर्शन आहे.
संकल्पना आणि छायाचित्रे – संदेश भंडारे
आयोजक
महाराष्ट्र राज्य महिला आयोग
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…