📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 7, 2026
वेब स्टोरी

उजेडाच्या वाटेवर प्रदर्शनाला मुदतवाढ

Ujedachya Vata women themed photo exhibition by photographer Sandesh Bhandare at Ravindra Natya Mandir Mumbai

प्रदर्शनाला मुदतवाढ
मंगळवार १० आणि बुधवार ११ मार्च रोजी हे प्रदर्शन खुले राहील. महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे भरवण्यात आलेले प्रसिद्ध छायाचित्रकार, अभ्यासक, लेखक संदेश भंडारे यांच्या “उजेडाच्या वाटा “या महिलांविषयीच्या छायाचित्र प्रदर्शनाला १२ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . पु .ल .देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या- रवींद्र नाट्यगृह, कलादालनात पाच ते आठ मार्च दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

उजेडाच्या वाटेवर

कधी स्वतः प्रकाश होऊन,
कधी पावला पुरत्या प्रकाशात हळूहळू पुढे पुढे जाणाऱ्या,
कधी अख्खी वाट उजेडात भरून टाकणाऱ्या, या सगळ्या जणी,
आमच्या अवतीभवती आहेत.

समाजात निम्म्या संख्येने असलेल्या स्त्रियांचा हा अवकाश,
त्यांच्या कामाचा कष्टांचा, स्वप्नांचा आणि
जाणिवांचा परिघ काळाबरोबरच विस्तारत आहे.

स्त्रीचे स्थान काळानुरूप बदलत आहे.
प्रत्यक्ष जीवनात रोजच्या वर्तनातून ते प्रतिबिंबित होत राहते.
छायाचित्रणाच्या माध्यमातून कलाकाराला दिसलेले
स्त्री जीवनाचे वेगवेगळे पैलू
सामाजिक दृष्ट्या उलगडत जातात.

ही छायाचित्रे पाहताना
सहजरित्या दिसणाऱ्या गोष्टींचे गर्भित अर्थ
प्रेक्षकांच्या मनात उमटत उमटावेत आणि
कित्येक गृहीत धरलेल्या गोष्टींमधील धारणा
या निमित्ताने लख्ख दिसून यावी,
हाच आमचा हेतू आहे.

स्त्रियांच्या क्षमतांविषयीचे समज मोडणारी,
कामातील तिची असोशी दाखवणारी,
तिच्या पारंपरिक भूमिकांना छेद देणारी,
त्याचबरोबर पारंपरिक भूमिकांचे महत्त्व सांगणारी,
तिचा सामाजिक स्तर दाखवणारी,
जिद्द दाखवणारी,

ही छायाचित्रे...

प्रेक्षकांचा आणि समाजाचा
स्त्रीविषयक दृष्टिकोन सुदृढ करणारे हे प्रदर्शन आहे.

संकल्पना आणि छायाचित्रे – संदेश भंडारे

आयोजक
महाराष्ट्र राज्य महिला आयोग

Related posts

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी प्रकाशन

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

आठ वर्षात देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्के वाढ

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406