वैशाखवणवा

मीही आतुर झाली त्या‌ पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत सख्यासवे प्रीतीच्या झुल्यावर झुलायला… मोहरायला……!! आणि तोही सज्ज झालाय आतुरल्या मनाला प्रेमात आकंठ बुडून चिंब चिंब भिजवायला…

पल्लवी उमरे

जाळी वैशाख वनवा
‌होते जीवाची काहीली
आस मृगाच्या सरीची
तृष्णा बनून राहिली….!!💧

ग्रीष्माचा दाह, त्याची प्रखरता आता सहन होत नाहीए…. सर्व सजीव होरपळून पार निघालेय सूर्य तर आग ओकतोय… तप्त वाऱ्याची झुळूकही आता सहन होईना… सुर्याच्या दाहक किरणांनी पोळलीय अवघी सृष्टी अंग अंग कसं करपल्यागत झालीय…. हिरवी नाजूक कुरणं दिनकराच्या तेजोवलयापुढे मलूल झालीय … सारे नतमस्तक झाले रे तुझ्यापुढे सूर्या….!!
जणू सारा गिळंकृत करण्याचा इरादा तुझा. अवघं रान दाहकतेने पोळून निघाले. तप्त निखाऱ्यासारखे चटके बसताहेत अंगाअंगाला..

भेगाळली भुई सारी,
रान सारं करपलं
सुख कोवळ्या जीवाचं
शोधू कुठे हरपलं…..!!

वैशाखवणव्यात पोळून धरणीही बघ कशी भेगाळल्यागत होऊन आवासून बघतेय त्या मेघांकडे व्याकुळ होऊन….तिची लेकरं सारी त्राही त्राहीमान झाल्यागत घामाच्या धारांनी डबडबलीय….गाईवासरे चारापाण्यासाठी हंबरतायत, जणु मेघांना साथ घालताहेत. तो चातक पक्षीबघा कसा चोच वर करून पाण्याच्या एका थेंबासाठी आतुरलाय….उगाच नाही त्याला कोणी चातक म्हणत…. तोच तर वर्दी देतोय ना तुझ्या येणाची…. सारे सजीव हुश्श्य हुश्श्य करीत उसासे सोडत आहेत…!! रखरखत्या उन्हात झाडे, वृक्ष, वेली सुकून गेलीये….एखादी षोडस ललना उन्हाने झाकोळावी तशी कोमेजून गेलीये…. सारं रान कसं ओसाड आणि भकास वाटतंय जणू सृष्टीला अवकळा आलीय……!!

मैना, राघू, कबुतर, मोर, लांडोर सर्व जीवांच्या अंगाचा दाह झाला नुसता…काहिली काहिलीत होतेय रे जीवांची…हा अग्नीदाह शांत करायला ये रे बाबा बाहू पसरवत आणि बरसून जा एकदाचा,घाल फुंकर सर्वांच्या मनांगणावर…..!!

ए मेघ सांगना रे त्या पावसाला, कर ना रे एकदाच गर्दी मेघांची, चालू दे अंबरात तुझा तोच खेळ लपंडावाचा अगदी धडाड धूम..तोच सोहळा बघायला आतुरलीय अवघी सृष्टी, त्या चातकाने बघ कसे कान टवकारले…. ये बाबा एकदाचा घननिळा मेघ बनून, सागराची अवखळ लाट बनून…अवनीचा प्रियकर बनून ये… अंगांग भिजवण्यासाठी सळसळत ये रे मेघ एकदाचा….मोरलांडोर आतुरलेयतं प्रणयराधनेसाठी,धरणीही आसुसलीय,तुझ्या मिलनासाठी,कोकीळेचे गुंजन सुरु झालेलं त्या आमराईत,तीही भावविभोर झालीय आताशा…..!!

आसूसले रान सारे
देई काहील्या जीवास शांती
रणरणते उन्हं झेली अंगावर
नसे तुज काही भ्रांती…

परसबागेतली रजनीगंधा, निशिगंधा, अबोली, चाफा, शेवंती बघ कशी सुकून हिरमुसली, मलूल झालीय……!!
मोगऱ्याच टपोरपण, त्याचा सुगंध हरवलाय. अवघं चैतन्यच हरवलय सृष्टीचं…. विराण भकास वाटतंय अवघं विश्व…. फुलव रे बाबा सृष्टी एकदाची….व्याकुळ धरणीही बघ मेघाच्या मिलनासाठी आतुरलीय… तिलाही तुझा विरह आता सहन होत नाहीये. कशी डोळ्यात प्राण आणून चातकासारखी वाट बघते तुझी….!!

का रे असा सतावतोय तिला, तिच्या अंतरीच्या वेदना कोण समजून घेणार, किती विनवणी करायची तुझी आणि तू आहेस कि तुला कशाकशाची भ्रांत नाही मुळी…. धरती प्रसवण्यासाठी तुझ्यात चिंब भिजण्यासाठी आतुरली नुसती. राणपाखरांचे आर्तस्वर आसमंतात भरून राहिलेत. टिटवीही टिवटीव करीत तुला साद घालतेय. वाराही शीळ घालायला आतुरलाय, नद्या नाले झरे खळखळून हसण्यासाठी आतुरले….!!

आली मेघांची वर्दी 🌨️
सुटला गारगार वारा
होरपळलेल्या मनाला
चिंब भिजवतोय सारा…!!

आनंदोत्सव पावसाचा
धरती मेघ मिलनाचा
मळभलेल्या मनाला
देई स्पर्श चैतन्याचा…!!

आता मात्र‌ प्रतिक्षा संपलीय ,काळ्या मेघांची ढगात‌ गर्दी दाटलीय… नील अंबरात मेघांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू झालाय,वार् यालाही उधाण आलंय …तो‌ सर्व‌ त्राहीमान जीवांना वर्दी देत सुटलाय ,त्याचाही आनंद गगनात मावेनासा ‌झालाय,तोही तेवढाच अधीर‌ झालाय मेघांच्या स्वागतासाठी……!!
“आले आभाळ भरुन⛈️
ढोल ताशांचा गजर
आज ‌येणार ग बाई
‌‌ माझा पाऊस साजणं” !!

आले, आले बरं का ते काळेकभिन्न श्यामल मेघ दाटून आलेत सौदामिनीची आणि ढगांची जुगलबंदी रंगतेय निलनभात कशी चपखल नृत्य करतेय बघ सौदामिनी अंबरी ढोल ताशा च्या गजरात….गेली गेली शिळ रानावनात आताशा बरसल्या रिमझिम धारा….सुरू झाले मयूराचे नर्तन केतकीच्या बनात लांडोरीसवे
रोमांचित झाली सृष्टी,पिसाटला रानवारा….!!
हर्षियली सृष्टी सारी आतुरली स्वागताला धोधो बरसल्या सरी धरतीमेघ मिलनाला…!!प्रसवेल धरणीही ,उतावळी रुजण्याला….फुटे कोंबही बिजांकुराला…..!!

मीही आतुर झाली त्या‌ पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत सख्यासवे प्रीतीच्या झुल्यावर झुलायला… मोहरायला……!! आणि तोही सज्ज झालाय आतुरल्या मनाला प्रेमात आकंठ बुडून चिंब चिंब भिजवायला…सृष्टी सृजन फुलविण्यासाठी….नवनिर्मितीसाठी…!!
आनंदाचे तुषार झेलत…!!

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

5 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

1 day ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

3 days ago