काय चाललयं अवतीभवती

‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार २०२४ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार २०२४ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०२५ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी कथासंग्रह/ललितसंग्रह; कादंबरी, कवितासंग्रह या तीन विभागात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ३ पुरस्कार देण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती लेखक, कवी अथवा प्रकाशकांनी पाठवाव्यात. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. संबंधित साहित्यिकांनी ५ जानेवारी २०२५ पर्यंत पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात, असे आवाहन डॉ. स्वामी यांनी केले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता असा :
अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा – इस्लामपूर,
राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी, दिवाण बंगल्याजवळ,
इस्लामपूर, ता. वाळवा, जिल्हा सांगली. पिन – 415 409.
संपर्क – 9511837879, 9923683773.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

6 hours ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

16 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

1 day ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

3 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago