शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रासायनिक खतामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती

नमस्कार शेतकरी बंधू,
आता पावसाला खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. शेतकरी बंधू भात, काजू, आंबा पिकांसाठी रासायनिक खताचा वापर करतील. परंतु सध्या बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतांचा पुरवठा होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली स्वतःची फसवणूक होऊ नये यासाठी काही जुजबी टेस्ट घरच्या घरी करू शकतात, जेणेकरून त्यांनी विकत घेतलेले रासायनिक खत प्राथमिक दृष्ट्या भेसळयुक्त आहे किंवा शुद्ध आहे हे तो ठरू शकतो, जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक फसगत होणार नाही.

विकास धामापूरकर,
शास्त्रज्ञ, कृषि विद्यान केंद्र, सिंधुदुर्ग

ह्या टेस्ट म्हणजे शंभर टक्के तंतोतंत खऱ्या असं म्हणू शकत नाही परंतु ह्या अशा प्रकारच्या टेस्ट शेतकऱ्यांनी घरच्या घरी केल्यानंतर त्याला त्यांनी विकत घेतलेल्या रासायनिक खताच्या शुद्धतेबद्दल नक्कीच व्यवस्थित खात्री होऊ शकते. यासाठी काही रासायनिक खतं गरम करण्याचा पण सल्ला दिलेला आहे तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी एक काचेची परीक्षा नळी विकत घ्यावी साधारणता पंचवीस ते तीस रुपयाला ही परीक्षा नवी विकत मिळते, बाकी दुसऱ्या कुठलाही रासायनिक द्रावण किंवा रासायनिक पदार्थांची खरेदी करण्याची आवश्यकता नाही. डिस्टिल्ड वॉटर ह्या मध्ये वापरायला संगितले आहे, त्या साठी बाजारामध्ये मिळणारे मिनरल वॉटर वापरले तरी चालू शकते.

युरिया
युरिया खताची शुद्धता तपासण्यासाठी एक महत्त्वाचा पद्धत म्हणजे युरियाचे थोडेसे दाणे घेऊन त्यामध्ये खाण्याचा चुना थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून दोन्ही मिश्रणे एकत्र करावी .जर युरिया खत शुद्ध असेल तर डोळ्यांना, डोक्याला, आणि नाकाला झोमणारा अमोनियाचा उग्र वास आला तर युरिया खत प्राथमिक दृष्ट्या शुद्ध आहे असं समजावं.

दुसऱ्या काही चाचण्या अशा –

  1. एका ग्लास पाण्यात थोड्या प्रमाणात युरिया विरघळवा.
  2. शुद्ध युरिया पूर्णपणे विरघळला पाहिजे, कोणताही अवशेष किंवा गढूळ पणा येता नये
  3. जर काही अवशेष राहिले (वाळू लहान दगड माती ) तर ते भेसळ दर्शवू शकते.
  4. शुद्ध युरिया सामान्यतः पांढरा असतो.
  5. आकार: आकारात एकसारखा असावा, सहसा दाणेदार असावा.
  6. : तो स्फटिकासारखा असावा आणि एकत्र ढेकळा सारखा नसावा.
  7. युरिया पाण्यात विरघळल्यावर ते थंड वाटले पाहिजे.
  8. युरिया गरम केल्यावर ते पूर्णपणे वितळले पाहिजे आणि कोणतेही अवशेष त्यामध्ये मध्ये सापडले तर ते भेसळ असल्याचे दर्शवू शकते
    सिंगल सुपर फोस्फेट (single super phosphate) डिस्टिल्ड वॉटरमध्ये थोड्या प्रमाणात एसएसपी विरघळवा. शुद्ध एसएसपी तुलनेने लवकर आणि पूर्णपणे विरघळले पाहिजे, कमीत कमी अवशेष राहिले पाहिजे. जर मोठ्या प्रमाणात अवशेष विरघळले नाहीत किंवा द्रावण गढूळ असेल तर ते भेसळ असल्याचे दर्शवू शकते.
    म्युरेट ऑफ पोट्याश(MOP)
  9. एमओपी पाण्यात सहज विरघळले पाहिजे, ज्यामुळे एक स्पष्ट द्रावण तयार होते. जर ते पूर्णपणे विरघळले नाही किंवा पृष्ठभागावर लालसर रंग तरंगला तर ते भेसळयुक्त असू शकते
  10. पाण्यात विरघळल्यावर शुद्ध एमओपी थंड वाटेल. जर ते थंड वाटत नसेल तर ते भेसळीचे लक्षण असू शकते
  11. एका परीक्षा नळी मध्ये साधारणता 1 ग्रॅम mop घेऊन गॅस वर गरम करावे शुद्ध एमओपी वितळेल आणि थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होईल. जर ते योग्यरित्या वितळले नाही किंवा घट्ट झाले नाही तर ते भेसळयुक्त असू शकते.

( डीएपी) DAP
डीएपी हे खत पण मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूं कडून वापरले जाते आणि डीएपी या खताची शुद्धता तपासणी करण्यासाठी साधारणता दोन ते तीन ग्रॅम एवढं डीएपी खत घ्यावा आणि त्यामध्ये खाण्याचा चुना थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून हातावर दोन्ही मिश्रणे, खत आणि चुना व्यवस्थित मिक्स करावा. मिक्स केल्यावर या मिश्रणाचा वास घ्यावा जर उग्र वास आला म्हणजे अमोनियाचा उग्र वास आला तर प्राथमिक दृष्ट्या डीएपी हे खत शुद्ध आहे जर नाकाला आणि डोक डोळ्यांना तसेच डोक्याला झुमणारा अमोनियाचा वास आला नाही तर समजावं डीएपी या खतामध्ये भेसळ आहे.

एनपीके खत (NPK) सुफला संपूर्णा
नमुना पाण्यात विरघळवा. तो पूर्णपणे विरघळतो का ते पहा. काही भेसळयुक्त पदार्थ विरघळू शकत नाहीत आणि अवशेष पाण्या मध्ये दिसून येतात.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

21 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

1 day ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

4 days ago