शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रासायनिक खतामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती

नमस्कार शेतकरी बंधू,
आता पावसाला खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. शेतकरी बंधू भात, काजू, आंबा पिकांसाठी रासायनिक खताचा वापर करतील. परंतु सध्या बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतांचा पुरवठा होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली स्वतःची फसवणूक होऊ नये यासाठी काही जुजबी टेस्ट घरच्या घरी करू शकतात, जेणेकरून त्यांनी विकत घेतलेले रासायनिक खत प्राथमिक दृष्ट्या भेसळयुक्त आहे किंवा शुद्ध आहे हे तो ठरू शकतो, जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक फसगत होणार नाही.

विकास धामापूरकर,
शास्त्रज्ञ, कृषि विद्यान केंद्र, सिंधुदुर्ग

ह्या टेस्ट म्हणजे शंभर टक्के तंतोतंत खऱ्या असं म्हणू शकत नाही परंतु ह्या अशा प्रकारच्या टेस्ट शेतकऱ्यांनी घरच्या घरी केल्यानंतर त्याला त्यांनी विकत घेतलेल्या रासायनिक खताच्या शुद्धतेबद्दल नक्कीच व्यवस्थित खात्री होऊ शकते. यासाठी काही रासायनिक खतं गरम करण्याचा पण सल्ला दिलेला आहे तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी एक काचेची परीक्षा नळी विकत घ्यावी साधारणता पंचवीस ते तीस रुपयाला ही परीक्षा नवी विकत मिळते, बाकी दुसऱ्या कुठलाही रासायनिक द्रावण किंवा रासायनिक पदार्थांची खरेदी करण्याची आवश्यकता नाही. डिस्टिल्ड वॉटर ह्या मध्ये वापरायला संगितले आहे, त्या साठी बाजारामध्ये मिळणारे मिनरल वॉटर वापरले तरी चालू शकते.

युरिया
युरिया खताची शुद्धता तपासण्यासाठी एक महत्त्वाचा पद्धत म्हणजे युरियाचे थोडेसे दाणे घेऊन त्यामध्ये खाण्याचा चुना थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून दोन्ही मिश्रणे एकत्र करावी .जर युरिया खत शुद्ध असेल तर डोळ्यांना, डोक्याला, आणि नाकाला झोमणारा अमोनियाचा उग्र वास आला तर युरिया खत प्राथमिक दृष्ट्या शुद्ध आहे असं समजावं.

दुसऱ्या काही चाचण्या अशा –

  1. एका ग्लास पाण्यात थोड्या प्रमाणात युरिया विरघळवा.
  2. शुद्ध युरिया पूर्णपणे विरघळला पाहिजे, कोणताही अवशेष किंवा गढूळ पणा येता नये
  3. जर काही अवशेष राहिले (वाळू लहान दगड माती ) तर ते भेसळ दर्शवू शकते.
  4. शुद्ध युरिया सामान्यतः पांढरा असतो.
  5. आकार: आकारात एकसारखा असावा, सहसा दाणेदार असावा.
  6. : तो स्फटिकासारखा असावा आणि एकत्र ढेकळा सारखा नसावा.
  7. युरिया पाण्यात विरघळल्यावर ते थंड वाटले पाहिजे.
  8. युरिया गरम केल्यावर ते पूर्णपणे वितळले पाहिजे आणि कोणतेही अवशेष त्यामध्ये मध्ये सापडले तर ते भेसळ असल्याचे दर्शवू शकते
    सिंगल सुपर फोस्फेट (single super phosphate) डिस्टिल्ड वॉटरमध्ये थोड्या प्रमाणात एसएसपी विरघळवा. शुद्ध एसएसपी तुलनेने लवकर आणि पूर्णपणे विरघळले पाहिजे, कमीत कमी अवशेष राहिले पाहिजे. जर मोठ्या प्रमाणात अवशेष विरघळले नाहीत किंवा द्रावण गढूळ असेल तर ते भेसळ असल्याचे दर्शवू शकते.
    म्युरेट ऑफ पोट्याश(MOP)
  9. एमओपी पाण्यात सहज विरघळले पाहिजे, ज्यामुळे एक स्पष्ट द्रावण तयार होते. जर ते पूर्णपणे विरघळले नाही किंवा पृष्ठभागावर लालसर रंग तरंगला तर ते भेसळयुक्त असू शकते
  10. पाण्यात विरघळल्यावर शुद्ध एमओपी थंड वाटेल. जर ते थंड वाटत नसेल तर ते भेसळीचे लक्षण असू शकते
  11. एका परीक्षा नळी मध्ये साधारणता 1 ग्रॅम mop घेऊन गॅस वर गरम करावे शुद्ध एमओपी वितळेल आणि थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होईल. जर ते योग्यरित्या वितळले नाही किंवा घट्ट झाले नाही तर ते भेसळयुक्त असू शकते.

( डीएपी) DAP
डीएपी हे खत पण मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूं कडून वापरले जाते आणि डीएपी या खताची शुद्धता तपासणी करण्यासाठी साधारणता दोन ते तीन ग्रॅम एवढं डीएपी खत घ्यावा आणि त्यामध्ये खाण्याचा चुना थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून हातावर दोन्ही मिश्रणे, खत आणि चुना व्यवस्थित मिक्स करावा. मिक्स केल्यावर या मिश्रणाचा वास घ्यावा जर उग्र वास आला म्हणजे अमोनियाचा उग्र वास आला तर प्राथमिक दृष्ट्या डीएपी हे खत शुद्ध आहे जर नाकाला आणि डोक डोळ्यांना तसेच डोक्याला झुमणारा अमोनियाचा वास आला नाही तर समजावं डीएपी या खतामध्ये भेसळ आहे.

एनपीके खत (NPK) सुफला संपूर्णा
नमुना पाण्यात विरघळवा. तो पूर्णपणे विरघळतो का ते पहा. काही भेसळयुक्त पदार्थ विरघळू शकत नाहीत आणि अवशेष पाण्या मध्ये दिसून येतात.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

5 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

6 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

16 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago