काय चाललयं अवतीभवती

कवी हबीब भंडारे यांच्या कवितांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश

औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखककवी हबीब भंडारे यांच्या कवितांचा देशातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्ष मराठी अनिवार्य या विषयासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून ‘निवडक कवितांचा अभ्यास’ अंतर्गत एका कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालय (स्वायत्त) येथेही बी.ए.प्रथम वर्ष मराठी अनिवार्य या विषया अंतर्गत ‘विद्याशाखीय विशेष निवड (DSE): मराठी अभ्यासपत्रिका-२’ करिताच्या अभ्यासक्रमासाठी ‘फकिराची अनेक चिंधकांनी शिवलेली झोळी’ या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील एम.ए. हिंदी प्रथम वर्षाच्या ‘समकालीन मराठी अनूदित कविता’ अंतर्गत दोन कवितांचा समावेश शैक्षणिक वर्ष सन-२०२१-२२ पासून करण्यात आलेला आहे.

हबीब भंडारे हे मराठी कवितेतील एक महत्त्वाचं नाव असून जनसामान्यांचा जीवनसंघर्ष, प्रश्न, घुसमट, वेदना, जगण्यातील आशावाद त्यांच्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त होतो. हबीब भंडारे यांचे ‘माळावरची पेरणी’, ‘ढेकळाचा गंध’, ‘बांधावरच्या बाभळी आणि इतर कविता’, ‘मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं’, ‘जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता’, ‘ ‘अस्वस्थ एकांत’, इत्यादी महत्त्वाचे कवितासंग्रह तसेच नाट्यलेखन आणि बालसाहित्यही प्रसिद्ध आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 day ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 day ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

3 days ago