विश्वाचे आर्त

मन लावून विहित कर्मे करणे गरजेचे

साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली साधना होत नाही. सोहम साधनेचे उचित फळ मिळण्यासाठी मनातून साधना करायला हवी. मन साधनेवर केंद्रीत ठेवायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देऊनी । करी कर्मे ।। २६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्म फलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस.

साधना हे सुद्धा कर्मच आहे. या कर्मातून आपणाला काय मिळते ? मनशांती साधनेतून मिळते. उर्जा, चैतन्य, स्फुर्ती, तजेलता, उत्साह अशा अनेक गोष्टी साधनेतून मिळतात. यासाठी साधनेचे कर्म हे करायलाच हवे. मनापासून साधना करायला हवी. अपेक्षा ठेवून आपण कर्म करायला लागलो तर आपल्या हाती काहीच लागत नाही, असे बऱ्याचदा घडते. याचा उलटा परिणामही होऊ शकतो. यासाठीच कर्म करायचे पण फळाची आशा ठेवायची नाही. हे मिळेल, ते मिळेल अशी आशा ठेवून कर्म कधीच करायचे नाही. कारण त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर नैराश्य पदरी पडू शकते. हे नैराश्य मनाची स्थिती बिघडवू शकते. साधनेत मन न लागण्याची समस्या बळावू शकते.

साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली साधना होत नाही. सोहम साधनेचे उचित फळ मिळण्यासाठी मनातून साधना करायला हवी. मन साधनेवर केंद्रीत ठेवायला हवे. जप करताना आपण माळा फक्त ओढतच राहातो. किती माळा साधना झाली याचेही भान कधी कधी आपणाला नसते. तोंडातून जप मात्र सुरू असतो, पण मन मात्र जपामध्ये गुंतलेले नसते. असे बऱ्याचदा होते. कर्म करत राहायचे, पण मन मात्र कर्मात गुंतलेले नसते. अशाने उचित फळप्राप्ती कशी होईल ? यासाठीच एक माळ जप करावा, पण तो मनापासून करावा.

जप करत असताना नाम मुखातून उच्चारले जात असते, पण मन मात्र त्यावर केंद्रीत नसते. मनाला जेंव्हा याची जाणीव होते तेंव्हा आपण सावध होतो अन् पुन्हा जपावर मन केंद्रीत करतो. असे बऱ्याचदा होत असते. मनामध्ये जागृती येणे महत्त्वाचे आहे. भानावर येऊन साधना करायला हवी. हळूहळू सवयीने मनाची ही भटकंती कमी होऊ शकते. यासाठीच साधनेचा सराव हा नित्य करायला हवा. सरावाने साधनेत मन रमू लागते. मनापासून साधनेचे कर्म होऊ शकते.

आपले मन साधनेत असो वा नसो, साधना मात्र नित्य सुरू असते. सोहमचे स्वर हे आपल्यात उमटत असतात. श्वास जोपर्यंत सुरू असतो तोपर्यंत सोहमचा हा स्वर निर्माण होतच असतो. हा सुरू असलेला स्वर आपणाला पकडायचा असतो. हेच आपले कर्म आहे. स्वराचा अनुभव आपल्या मनाला जेंव्हा होईल अन् मन त्या स्वरामध्ये रमेल तेंव्हाच खरी साधना फलद्रुप होईल. स्वर मनाने, कानाने ऐकायचा, स्वराचा स्पर्श अनुभवयाचा, स्वराचा स्वाद चाखायचा, त्याची गोडी जेंव्हा आपणाला अनुभवता येईल तेंव्हाच त्याचे ज्ञान आपणाला होईल. हे स्वराचे ज्ञान हेच आत्मज्ञान. हीच अनुभुती आपणाला साधनेत यायला हवी. यासाठीच मन लावून साधनेचे विहित कर्म हे करणे गरजेचे आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

6 hours ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

8 hours ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

18 hours ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

1 day ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

1 day ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

2 days ago