काय चाललयं अवतीभवती

डॉ. रणधीर शिंदे, प्रा. विलास वैद्य यांना काव्यपुरस्कार

मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ रणधीर शिंदे आणि प्रा. विलास वैद्य यांना पुरस्कार

औरंगाबाद : ‘मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार’ व्यासंगी समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर झाला आहे. ‘कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार’ ज्येष्ठ प्रा. विलास वैद्य यांना जाहीर करण्यात आला आहे,’ अशी माहिती ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी दिली.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी (२६ फेब्रुवारी) कविता दिनानिमित्त दोन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नांदापूरकर सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम होईल. यंदाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार’ कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर झाला आहे. ते तरुण पिढीतील अग्रगण्य काव्यसमीक्षक आहेत. दि. पु. चित्रे, बा. सी. मर्ढेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, संतकविता या विषयांवर त्यांनी व्यासंगपूर्ण मांडणी केली आहे. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

हिंगोली येथील प्रसिद्ध कवी प्रा. विलास वैद्य यांना ‘कवयित्री लीला धनपलवार काव्यपुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचे ‘गलफ’, ‘आलाप’, ‘माझ्या प्रयोगशील देशात’ आणि ‘लढा’ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. वाचक चळवळीत त्यांचे विशेष योगदान आहे. कवयित्री अनुराधा पाटील, डॉ. आसाराम लोमटे आणि श्रीधर नांदेडकर यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली. पुरस्कारांची घोषणा करताना डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, किरण सगर उपस्थित होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

10 hours ago

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

23 hours ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

1 day ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

1 day ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

2 days ago