Cyclone 'Montha' to Bring Heavy Rain to Vidarbha, Konkan & Mumbai Till October 30
‘ मोंथा ‘ मुळे विदर्भात तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. ‘
मोंथा ‘ –
बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाब क्षेत्राचे काल रात्री चक्री वादळात रूपांतर झाले असुन सध्या ते काकीनाडा शहरापासून ५३० किमी. अंतरावर आहे. एम. जे. ओ. च्या त्याचे ‘ मोंथा ‘ असे नामकरण झाले. ‘ मोंथा ‘ चा ‘थाई’ भाषेतील अर्थ म्हणजे ‘ सुवासिक फुल ‘ होय.
उद्या मंगळवार दि. २८ ऑक्टोबर ला रात्री ‘ मोंथा ‘ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्रप्रदेशातील ‘काकीनाडा’ शहराजवळील किनारपट्टी वरून भू-भागावर आदळण्याची शक्यता जाणवते. तेथून पुढे उत्तर दिशेने ते प्रथम ओरिसा व नंतर छत्तीसगड कडे सरकेल.
सध्या बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडे वि्षुववृत्तीय परीक्षेत्रात म्हणजे फेज ४ व ५ मध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशनच्या साखळीची आम्प्लिट्युड २ च्या दरम्यान आहे. ह्या दोलणामुळे ‘ मोंथा ‘वादळाला वाढीव ऊर्जा मिळत असल्यामुळे तत्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे.
जेंव्हा ‘मोंथा’ छत्तीसगड मध्ये प्रवेशित होईल तेंव्हा संपूर्ण विदर्भात उद्या पासून तीन दिवस म्हणजे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून मराठवाड्यातही त्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या नैऋत्येकडे ६६० किमी. अंतरावर असुन त्याची वाटचाल ईशान्य दिशेकडे होत आहे. त्याच्या परिणामातून आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे बुधवार दि. २९ ऑक्टोबर पर्यन्त मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
बुधवार दि. ५ नोव्हेंबरपासुन महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता असुन त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल घेऊ या !
सध्याचा पाऊस व उभा असलेला लाल कांदा आणि उन्हाळ कांदा रोपे ह्या पिकांभोवतीच सध्या शेतकऱ्यांचा विचार फिरत आहे. म्हणून ‘ लाभदायक पाऊस ‘ हा धाडसाने टाकलेला विचार काहींना विसंगतही वाटला असेल. परंतु येणारे गहू, हरबरा, ज्वारी, उन्हाळ कांदा व इतर भाजीपाला इ. साठी व शिवाय संपूर्ण रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीचा ‘ पीएच ‘ वाढवून देणारा विशेषतः ऑक्टोबर दुसऱ्या पंधरवाड्यातील हा पाऊस लाभदायकच ठरेल, हे येणारा काळच ह्याचे उत्तर देईल, असे वाटते.
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…