काय चाललयं अवतीभवती

टपाल विभागाची पत्र लेखन स्पर्धा

टपाल विभागाची पत्र लेखन स्पर्धा: 14 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

पणजी – टपाल विभागाने ‘लेखनाचा आनंद: डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्र लेखन स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे आपले विचार एसएसपीओ, मुंबई, दक्षिण विभाग, मुंबई-400001 यापत्त्यावर  पत्र पाठवू  शकतात.

ही पत्र मोहीम 14 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली असून 14 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. 14 डिसेंबर 2024 नंतर पाठवलेली पत्रे स्वीकारली जाणार नाहीत. पत्र इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत लिहिले जाऊ शकते. स्पर्धा दोन वयोगटांसाठी आयोजित केली जात आहे – 18 वर्षांपर्यंतचे सहभागी आणि 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे सहभागी स्पर्धक. पत्रे आंतरदेशीय पत्र श्रेणी किंवा लिफाफा श्रेणीत सादर केली जाऊ शकतात.

प्रत्येक श्रेणीत विभागीय स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते अनुक्रमे 25,000 रुपये, 10,000 रुपये आणि 5,000 रुपये बक्षीस मिळतील.तर राष्ट्रीय स्तरावरील फेरीत प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 10,000 रुपये अशी बक्षिसे दिली जातील. विभागीय स्तरावर निवडलेली पत्रे राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी विचारात घेतली जातील.

लिफाफा श्रेणीत पत्र A-4 आकाराच्या कागदावर 1000 शब्दांच्या मर्यादेत असावे, आणि आंतरदेशीय पत्र श्रेणीत 500 शब्दांची शब्द मर्यादा आहे. फक्त हस्तलिखित पत्रेच स्वीकारली जातील.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी टपाल विभागाच्या शिक्के असलेल्या लिफाफ्याचा किंवा आंतरदेशीय पत्राचाच वापर करणे अनिवार्य आहे . लिफाफा/आंतरदेशीय पत्रावर “ढाई आखर पत्र” असे शीर्षक लिहिलेले असावे.

सहभागींनी आपल्या वयाचा पुरावा म्हणून पत्रावर असे प्रमाणपत्र देखील द्यावे, “मी प्रमाणित करतो/करते की 01 जानेवारी 2024 रोजी माझे वय 18 वर्षांहून कमी/अधिक आहे.” विभागीय स्तरावरील अंतिम निकाल 23 जानेवारी 2025 रोजी घोषित केला जाईल.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

5 minutes ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

60 minutes ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

1 day ago

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

1 day ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

2 days ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

2 days ago