fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 28, 2026
Home » टपाल विभागाची पत्र लेखन स्पर्धा
काय चाललयं अवतीभवती

टपाल विभागाची पत्र लेखन स्पर्धा

Postal Department Letter Writing Competition

टपाल विभागाची पत्र लेखन स्पर्धा: 14 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

पणजी – टपाल विभागाने ‘लेखनाचा आनंद: डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्र लेखन स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे आपले विचार एसएसपीओ, मुंबई, दक्षिण विभाग, मुंबई-400001 यापत्त्यावर  पत्र पाठवू  शकतात.

ही पत्र मोहीम 14 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली असून 14 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. 14 डिसेंबर 2024 नंतर पाठवलेली पत्रे स्वीकारली जाणार नाहीत. पत्र इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत लिहिले जाऊ शकते. स्पर्धा दोन वयोगटांसाठी आयोजित केली जात आहे – 18 वर्षांपर्यंतचे सहभागी आणि 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे सहभागी स्पर्धक. पत्रे आंतरदेशीय पत्र श्रेणी किंवा लिफाफा श्रेणीत सादर केली जाऊ शकतात.

प्रत्येक श्रेणीत विभागीय स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते अनुक्रमे 25,000 रुपये, 10,000 रुपये आणि 5,000 रुपये बक्षीस मिळतील.तर राष्ट्रीय स्तरावरील फेरीत प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 10,000 रुपये अशी बक्षिसे दिली जातील. विभागीय स्तरावर निवडलेली पत्रे राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी विचारात घेतली जातील.

लिफाफा श्रेणीत पत्र A-4 आकाराच्या कागदावर 1000 शब्दांच्या मर्यादेत असावे, आणि आंतरदेशीय पत्र श्रेणीत 500 शब्दांची शब्द मर्यादा आहे. फक्त हस्तलिखित पत्रेच स्वीकारली जातील.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी टपाल विभागाच्या शिक्के असलेल्या लिफाफ्याचा किंवा आंतरदेशीय पत्राचाच वापर करणे अनिवार्य आहे . लिफाफा/आंतरदेशीय पत्रावर “ढाई आखर पत्र” असे शीर्षक लिहिलेले असावे.

सहभागींनी आपल्या वयाचा पुरावा म्हणून पत्रावर असे प्रमाणपत्र देखील द्यावे, “मी प्रमाणित करतो/करते की 01 जानेवारी 2024 रोजी माझे वय 18 वर्षांहून कमी/अधिक आहे.” विभागीय स्तरावरील अंतिम निकाल 23 जानेवारी 2025 रोजी घोषित केला जाईल.

Related posts

साहित्यकणा फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !

ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार मांडणार महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर मते

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!