मुक्त संवाद

प्रभाती सूरमनी रंगती

निसर्गचक्रापैकी पहिला टप्पा म्हणजे प्रभात, सकाळ यालाच अमृतवेला, सुवर्णवेला असे म्हटले जाते.
“लवकर नीजे, लवकर उठे
त्याची सदा आरोग्य लाभे”
या म्हणीनुसार व्यक्तिमत्व विकासाकरता, आरोग्य सुदृढ राहण्याकरिता, मनःशांती करिता मंगलवेळा आपली आतुरतेने वाट बघते व आपले सुंदर स्वागत करण्यास सज्ज असते. वातावरणात भरपूर प्रमाणात प्राणवायू असतो. या प्रभाती भक्तगण घराघरात, मंदिरात नामस्मरण आराधना करून मनःशांती लाभण्याकरिता उपासना करतात.

योगीजन योग साधतात, विद्यार्थी आपल्या जीवनाचा मार्ग यशस्वी करण्याकरिता अध्ययन करतात. आरोग्यदायी प्रभात ही परमेश्वराची अमूल्य देणगी होय. परमेश्वराने आपल्याला बहाल केली आहे. या अमूल्य क्षणाचा आनंद दिवसभर टिकून राहतो. मन आनंदाने भरून जाते, कल्पनाशक्ती जागृत करते. इहलोकीचे सौख्य व पारलौकिक सौख्य प्रदान करून देणारी आहे. हा निसर्गाचा मंगलमय सोहळा बघण्याचे भाग्य सर्वांना लाभो.

संतांनी म्हटलेले आहे
“उठा जागे व्हा रे आता
स्मरण करा पंढरीनाथा”
या मंगल प्रभाती दैवी शक्तीचा संचार देखील होत असतो. प्राणवायूचा भरभरून साठा आसमंतात. आळस झटकून त्या मंगलमय प्रभातीचे सर्वांनी स्वागत करावे. व्यक्तिगत प्रगती करण्याकरिता आरोग्याची उपासना करण्याकरिता भगवंताने आपल्याला अष्टौव प्रहरा पैकी सकाळचा प्रहर प्रदान केलेला आहे.
विशेषतः स्त्रियांना संसारीक जबाबदाऱ्या पेलताना स्वतःकडे, स्व आरोग्याकडे, विकासाकडे लक्ष देण्याला वेळच नसतो.

तर या अमृत वेळेचा जरूर आमच्या भगिनींनी लाभ घ्यावा असे मला वाटते या उषेचे सौंदर्य काही अप्रतिमच आहे. या पहाटेचे स्वागत करण्याकरिता हा भास्कर आपल्या सहस्त्र किरणांनी आपले बाहू पसरून सोनेरी किरणांनी सज्ज असतो. या भास्कराचे आगमन होत असताना हा नजारा, हे सौंदर्य आपण न्याहाळावे . दिवस निघाल्याबरोबर आपण सांसारिक चक्रामध्ये रममाण होतो. परंतु सकाळचे सौंदर्य न्याहाळण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभो. आपण या सुवर्ण क्षणांना मुकता कामा नये.

म्हणूनच कवीने म्हटलेले आहे..
“प्रभाती सूरमणी रंगती
दशदिशा भूपाळी म्हणती”.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

17 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

23 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago