Samyak Sambodhi Poetry Award 2025 Announced for Dr. Yogita Rajkar’s ‘Baipan’
डिसेंबर मध्ये सम्यक संबोधी साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण
कणकवली – सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा 2025 सालचा काव्य पुरस्कार वाई येथील कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या सृजन प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बाईपण’ या दीर्घ कवितेच्या संग्रहाला जाहीर झाला आहे. संस्थेच्या बैठकीत या पुरस्कारासाठी डॉ. राजकर यांच्या ‘बाईपण’ या काव्यसंग्रहाची निवड केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी दिली.
सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेची बैठक यावर्षी होणाऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे आयोजित करण्यात आली.संस्थेचे सचिव सूर्यकांत साळुंखे, उपाध्यक्ष संदीप हरी कदम, खजिनदार नेहा कदम, संतोष कदम, धम्मपाल बाविस्कर,सत्यवान साटम,रीना पाटील, शशिकांत तांबे आदी उपस्थित असणाऱ्या बैठकीत दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचा सदर पुरस्कार ‘बाईपण’ या काव्यसंग्रहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संस्थेच्या आगामी संमेलना संदर्भातही चर्चा करण्यात आली.
कवयित्री डॉ योगिता राजकार या नव्या पिढीतील एक प्रसिद्ध कवयित्री असून मुंबई सृजन प्रकाशनातर्फे त्यांचा ‘ बाईपण’ हा दीर्घ कवितेचा संग्रह प्रकाशित झाला आहे. बाईच्या शोषित जगण्याचा तळ खोदून काढताना बाईच्या अस्तित्वाचा धांडोळा घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न ‘ बाईपण’ या कवितेत करण्यात आला आहे. अतिशय सूक्ष्म पातळीवर बाईच्या दिनक्रमाची गाथा मांडता मांडता बाईच्या वेदनेचा पट उलगडत जाणारी ही कविता अपवादात्मक मराठीत लिहिल्या जाणाऱ्या कवयित्रींच्या दीर्घ कवितेत स्वतःच स्थान अधिक ठळक करत जाते. या सगळ्याचा विचार करून बाईपण या काव्यसंग्रहाची सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती किशोर कदम यांनी दिली.
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…