कविता

शब्द ही विलीन झाले….!

शब्द ही विलीन झाले....! 

आज कविता शांत झाली
नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली
सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली
समाजात ही हळहळ पसरली 

सरणावर जळते कविता 
धूर आभाळी गेला क्षणात ती राख होईल
जिथे तिथे वार्ता कळे दु:खाची ही कहाणी
शेवट ती कशीच ? आली

समाजात वावरणारी ती संघर्ष करणारी
कविता आम्हातून निघून गेली
झाले अबोल शब्द माझे कळता गज़ल तुझी
आज कशी? अश्रुची धारा नयनातूनी आली

नुसते शब्द जळतात साहित्यातून
तो अंगारा कसा ? ग! लावू कंपाळी 
नाही भाग्य कुणाचे ? इथे असे 
त्यातून ती एक कविता माझी 

जुने शब्द पुरोगामी झाले विचारवंतासाठी सदा
लेखक ही आत्मकथा लिहू लागले
माझी तुझला अर्पण करीतो कविता
अन् ते शब्द ही आत्ता विलीन झाले

कवी : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.
मो. ९६३७१६४१८९

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

10 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

11 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

21 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago