📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 2, 2026
कविता

शब्द ही विलीन झाले….!

shabd-hi-vilin-zhale-poem-by-umesh-parwar-goa
शब्द ही विलीन झाले....! 

आज कविता शांत झाली
नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली
सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली
समाजात ही हळहळ पसरली 

सरणावर जळते कविता 
धूर आभाळी गेला क्षणात ती राख होईल
जिथे तिथे वार्ता कळे दु:खाची ही कहाणी
शेवट ती कशीच ? आली

समाजात वावरणारी ती संघर्ष करणारी
कविता आम्हातून निघून गेली
झाले अबोल शब्द माझे कळता गज़ल तुझी
आज कशी? अश्रुची धारा नयनातूनी आली

नुसते शब्द जळतात साहित्यातून
तो अंगारा कसा ? ग! लावू कंपाळी 
नाही भाग्य कुणाचे ? इथे असे 
त्यातून ती एक कविता माझी 

जुने शब्द पुरोगामी झाले विचारवंतासाठी सदा
लेखक ही आत्मकथा लिहू लागले
माझी तुझला अर्पण करीतो कविता
अन् ते शब्द ही आत्ता विलीन झाले

कवी : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.
मो. ९६३७१६४१८९

Related posts

शेतकऱ्यांचे गर्जन गीत

छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग

नातेच जाळती ते माणूस संस्कृतीचे…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406