Shivneri Marathon in Junnar on Shivjayanti
गडप्रदक्षिणा घालणारा मॅरेथॉन मार्ग
3, 5, 10, 21.1 या चार गटात स्पर्धा
नाममात्र नोंदणी शुल्कात विविध सुविधा
शिवनेरी ट्रेकर्स जुन्नर मार्फत आयोजन
जुन्नर : अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या शिवजन्मभूमी जुन्नर येथे शिवनेरी ट्रेकर्स संस्थेमार्फत येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी शिवनेरी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीला प्रदक्षिणा घालून जिजाऊ व शिवरायांना मानवंदना देणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. सहभागासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे.
शिवनेरीवरील शिवजयंती हा फक्त पुणे जिल्ह्याच्याच नाही तर अवघ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आहे. दर वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने लाखो शिवप्रेमी शिवनेरीला भेट देतात. या ठिकाणाहून शिवरायांचा आचार, विचार व वारसा शिवज्योतीच्या माध्यमातून गावोगाव दौडत नेला जातो. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या निमित्ताने जिजाऊ व शिवरायांना मानवंदना देवून अबालवृद्धांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढविण्यासाठी शिवनेरी ट्रेकर्समार्फत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते पोलिस वा सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या जवानांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार आहे. तीन व पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धा तर सहकुटुंब आनंददायी अनुभव देणाऱ्या ठरणार आहेत. सहभागी स्पर्धकांना मॅरेथॉनचे खास टी शर्ट, शर्यत पूर्ण केल्यानंतर पदक व शर्यत किती वेळात पूर्ण केली याची नोंद असलेले प्रमाणपत्र, चहा नाश्ता, स्पर्धा मार्गावर पाणी, फळे, प्रथमोपचार आदी पुरक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. इच्छुकांना सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/shivneri-marathon-232343 या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : 9881143180, 9011583475
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…