Vishwakarma Tarun Mandal announced the State-Level Gavgaada Sahitya Puraskar 2025-26 honoring outstanding Marathi literary works and authors.
सोलापूर – वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या दर्जेदार मराठी साहित्यकृतींना दिला जाणारा राज्यस्तरीय ‘गावगाडा साहित्य पुरस्कार’ २०२५-२०२६ साठी जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचे हे पुरस्कार वितरणाचे १६ वे वर्ष आहे.
राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार
‘आकुबा आणि इतर कथा’ या आयु विलास खरात यांच्या कथासंग्रहाला
तसेच ‘भालचंद्र नेमाडे : साहित्य विचार आणि कादंबऱ्या’ या डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या समीक्षाग्रंथाला
मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार
‘आतली कवाडं’ या कवी मिथुन चंद्र चौधरी यांच्या कवितासंग्रहाला
तसेच ‘पुसट सावल्या गडद काळ’ या कवयित्री संध्या लगड यांच्या कवितासंग्रहाला
मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार
‘पीळ’ या दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या कादंबरीला
‘नाथ मंदिरांतील दिवस’ या मुकूंदराज कुलकर्णी यांच्या ललितलेखनाला
‘सणोत्सव’ या कवी विलास सिदंगीकर यांच्या बालकवितासंग्रहाला
तसेच ‘लव्ह इज लव्ह’ या आशा नेगी (पुणे) यांच्या कादंबरीला
मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार
‘आस्वाद साहित्याचा’ या प्रा. भास्कर भंगाळे (पंढरपूर) यांच्या समीक्षाग्रंथाला
संपादित ग्रंथ विभागातील पुरस्कार विभागून देण्यात आले असून, ‘सोलापूरची काव्यप्रभा’ – वंदना कुलकर्णी (सोलापूर) व ‘ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार’ – रमाकांत नारायणे (मुंबई) या ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे आहे.
या पुरस्कारांसाठी योगीराज वाघमारे, सुहास घुमरे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. डॉ. मच्छिंद्र नांगरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, श्रीकृष्ण जगदाळे, प्रा. हरिश्चंद्र साळुंके, प्रज्ञा दीक्षित आणि लक्ष्मण जगदाळे गुरुजी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता अक्षरवेल सभागृह, चाफेकर रस्ता, रामबाण कॉलनी, लोकमान्य वाचनालयाजवळ, मसाप पुणेसमोरील गल्ली, सदाशिव पेठ, पुणे येथे होणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…