विश्वाचे आर्त

साखर सर्वत्र गोड तसे सर्वांच्याठायी असणारा आत्मा एकच

मीठ म्हणजे एनएसीएल अमेरिकेत गेले तरी तेच भारतात आले तरी तेच. त्यात फरक नाही. अमेरिकेतील माणसात तोच आत्मा आहे. भारतातील माणसात तोच आत्मा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी ।
कां कोडी एकीं उसीं । एकचिं गोडी ।। 918 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातूंन जसा एकच खारेपणा असतो. अथवा कोट्यवधी उसांत गोडी जशी एकच असते.

मीठ खारट असते. साखर गोड असते. मिठाचा कोणताही कण हा खारटच असतो. तसे साखरेचा कोणताही कण गोडच असतो. हा ज्या त्या पदार्थाचा गुणधर्म आहे. मिठामध्ये सोडियम-क्लोरिन हे घटक असतात. त्या मूलद्रव्यापासून मीठ तयार होते. साखरेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे घटक असतात. उसामध्ये असणारी साखर ही इतर पिकामध्ये असणाऱ्या साखरेसारखीच आहे. फक्त त्याचे प्रमाण भिन्न आहे. उसामध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या रसापासून साखर तयार केली जाते.

विविध फळांमध्येही साखर असते. पण त्याचे प्रमाण वेगळे असते. मात्र गोडी एकच असते. उसाच्या बुडाचे कांडे अधिक गोड तर शेंड्याकडचा ऊस कमी गोडीला असतो. साखरेचे प्रमाण कमी अधिक असल्याने ही गोडी वेगवेगळी वाटते. पण रसातील साखरेचा कण हा गोडच असतो.

ज्वारीतील साखर, गव्हातील साखर, तांदळातील साखर, विविध फळातील साखर ही चवीला वेगळी वाटत असली तरी ती साखरच आहे. आपणास त्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे किंवा इतर मूलद्रव्यांशी झालेल्या संयोगामुळे चवीत फरक वाटतो. तसे देहात आलेला आत्मा हा एकच आहे. सर्व देहात असणारा आत्मा हा एकच आहे. पण तो वेगवेगळ्या देहात आल्याने तो वेगळा वाटत आहे. देहाला विविध आकार मिळाले आहेत. प्रत्येकाचा चेहरा हा वेगळा आहे. प्रत्येकाचा आकारही वेगवेगळा आहे. कोणी जाड आहे. कोणी बारीक आहे. कोणी उंच आहे तर कोणी बुटके आहे. पण त्यांच्याजवळचा आत्मा हा एकच आहे.

फळे हीसुद्धा विविध आकाराची आहेत. पिकेसुद्धा विविध आकाराची आहेत. पिकांचे दाणेही वेगवेगळे आहेत. काही लांबट आहेत तर काही गोल आहेत. त्यालाही विविध आकार आहेत. पण या सर्वांच्या ठायी असणारी साखर ही गोडच आहे. मीठ म्हणजे एनएसीएल अमेरिकेत गेले तरी तेच भारतात आले तरी तेच. त्यात फरक नाही. अमेरिकेतील माणसात तोच आत्मा आहे. भारतातील माणसात तोच आत्मा आहे. फुलांमध्ये असणाऱ्या विविध घटकांमुळे त्याचा रंग वेगळा झाला आहे. त्याच्या जनुकीय साखळीमुळे त्याचे रंग बदलले आहेत. जास्वंदीची फुले पूर्वी फक्त लाल-गुलाबी असायची. आता पांढरी, पिवळी अशी विविध रंगांची फुले पाहायला मिळतात. जास्वंदीच्या जनुकात तसा बदल केला गेला. रंगाचा जनुक बदलला तसा फुलांचा रंग बदलला. पण जास्वंद हे तेच आहे.

उसाचे कांडे विविध आकाराचे आहे. जातीनुसार कांड्याचा आकार बदलतो. जनुकीय बदलामुळे हे बदल झाले. पण त्यामध्ये असणारी साखर ही एकच आहे. ती बदलली आहे का? नाही. त्याचे प्रमाण कमी जास्त झाले आहे. त्यामुळे चवीला त्याची गोडी कमी जास्त वाटते. पण साखर ही शेवटी एकच आहे. तसा प्रत्येक देहात असणारा आत्मा हा एकच आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

फडणवीस दिल्लीला खरचं जाणार का हो…

स्टेटलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न गाजतो आहे—मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? केंद्रीय…

1 day ago

डॉ. अतुल मोहोड यांची सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड…

2 days ago

इंधन दराची अपारदर्शकता… मोदी सरकारचे अपयश ! Failure of Modi government

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना भारतीय ग्राहकांना डिझेल, पेट्रोल व…

2 days ago

महाराष्ट्र बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिये…!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या पहिल्याच पावसातील त्रुटींवरून सुरू झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 days ago

शहाजीराजांचा दरबार – भारतीय सांस्कृतिक समन्वयाची प्रयोगशाळा

भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि…

2 days ago

अस्वस्थतेच्या राखेतून अर्थाचा नवा अंकुर

‘निद्रानाशाची रोजनिशी’तून महेश लोंढे यांचा जागत्या काळाशी संवादमाणसाच्या निद्रानाशामागे केवळ झोपेचा अभाव नसतो; त्यामागे काळाचे…

3 days ago