विश्वाचे आर्त

गुरूंची आवश्यकता कशासाठी ?

चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणही आपल्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांनाही पोषक वातावरण मिळाले की तेही प्रकट होतात. यासाठीच संगत ही महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमध्ये आपल्यातील चांगल्या गुणांची वाढ होते. वाईटाच्या संगतीत आपल्यातील वाईट गुणही वाढू शकतात. यासाठी याची काळजी घेणे गरजेचे आहे. सुप्तावस्थेतेतील गुण प्रकट झाल्यानंतरच त्याची प्रचिती आपणास येते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

हे असो काष्ठापासोनि । मंथूनि घेतलिया वन्ही ।
मग काष्ठेही कोंडोनि । न ठके जैसा ।। १४०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – हे राहू दे, काष्ठापासून मंथन करून अग्नि उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडानीहि कोंडून राहात नाही.

जीवसृष्टीतील घटकांमध्ये अनेक गुण हे सुप्तावस्थेत असतात. या गुणांना पोषण वातावरण मिळाल्यास ते प्रकट होतात. आपल्या शरीरातही काही अंगभूत गुण आहेत पण त्यांच्यावाढीसाठी पोषक वातावरण मिळणे गरजेचे असते. अनेक कला, विचार आपल्यामध्ये सुप्तावस्थेत आहेत. याची जाणीवही आपणास नसते. ही जाणीव करून देण्यासाठीच मग एक गुरूची आवश्यकता भासते. कलेत पारंगत असणारा गुरू आपल्यातील हे गुण निश्चितच ओळखतो. अन् तो आपणाला जागे करतो. आपल्या गुणांना तो वाट करून देतो. अशा या गुरूची आवश्यकता याचसाठी आहे.

चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणही आपल्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांनाही पोषक वातावरण मिळाले की तेही प्रकट होतात. यासाठीच संगत ही महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमध्ये आपल्यातील चांगल्या गुणांची वाढ होते. वाईटाच्या संगतीत आपल्यातील वाईट गुणही वाढू शकतात. यासाठी याची काळजी घेणे गरजेचे आहे. सुप्तावस्थेतेतील गुण प्रकट झाल्यानंतरच त्याची प्रचिती आपणास येते. यासाठी त्या गुणांचा अंकूर फुटताच आपणास त्याची जाणीव होणे गरजेचे आहे. चांगले गुण असतील त्या अंकूरांना वाढू द्यावे पण वाईट गुण असतील तर ते अंकूर खुटून काढावेत. म्हणजे त्यांची वाढ होणारच नाही. असे केल्यास आपल्यातील वाईट गुणांवर आपणास नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

लाकडामध्ये अग्नी आहे. दह्यामध्ये लोणी आहे. पण हे आपणास वरवर पाहाता दिसत नाही. कारण ते गुण त्यामध्ये सामावलेले आहेत. ते गुण पोषक वातावरण मिळाल्यानंतर प्रकट होतात. लाकूड अग्नीजवळ नेल्यास ते पेट घेणार. लाकडामध्ये अग्नी हा सुप्तावस्थेत आहे. तो दुसऱ्या अग्नीमुळे प्रज्वलित होतो. मग लाकूड हे लाकूड राहात नाही, त्याची राख होते. या राखेपासून पुन्हा लाकूड करतो म्हटले तरी शक्य होणे नाही. तसेच दह्यामध्येही लोणी आहे. दही घुसळल्यानंतर त्याचे ताक होते व लोणी स्वतंत्र होते. या लोण्याचे पुन्हा दही करता येणे शक्य आहे का ? पण लोणी करण्यासाठी दह्याला घुसळावे लागते तेंव्हाच हे घडते हे लक्षात घ्यायला हवे.

या प्रमाणेच आपल्यामध्येही आत्मज्ञान हे सुप्तावस्थेत आहे. हे ज्ञान प्रकट करण्यासाठी आत्मज्ञानी गुरुंची गरज आहे. आपल्या शरीरातील आत्म्याची ओळख सद्गुरु करून देतात. आपली ओळख सद्गुरुंच्यामुळे होते. मी कोण आहे ? याचा बोध सद्गुरुंच्यामुळे होते. हे आत्मज्ञान तेव्हा प्रकट होते. एकदा ज्ञान झाल्यानंतर पुन्हा अज्ञानी कसे होता येईल ? म्हणजे पुन्हा माघारी येणे नाही. लाकडातील अग्नी जसा कोंडून राहात नाही तसा आपल्यातील आत्मज्ञानही कोंडून ठेवता येत नाही. योग्य वातावरण मिळाल्यास तेही प्रकट होते. आत्मज्ञानी संताच्या सहवासामध्ये ते प्रकट होते. संताच्या सहवासात अनुभूतीने हे ज्ञान होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

15 hours ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

16 hours ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

1 day ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

2 days ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 days ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

3 days ago