Ashadhi Ekadashi Rain Forecast: Heavy Rain to Continue Across Maharashtra Until July 25
आषाढी एकादशीपर्यन्त पावसाचे सातत्य कायम आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा.त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे. ९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
१- गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात दुसऱ्या आवर्तनातील सुरु असलेला मध्यम ते मुसळधार पाऊस अजुन पुढील पाच दिवस म्हणजे मोठ्या एकादशी(शनिवार दि. २५ जुलै, पंढरपूर यात्रे) पर्यन्त कायम राहण्याची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः आजच्यासारखाच उद्या व परवा(२२-२३ जुलै) ला पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता जाणवते.
२-द्वादशीपासुन उघडीप –
रविवार दि. २६ जुलै(द्वादशी)ते शुक्रवार दि. ३१ जुलै (महिनाअखेर) पर्यंतच्या सहा दिवसात मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूरपर्यंतच्या १० व मराठवाड्यातील ८ अश्या १८ जिल्ह्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते.मुंबईसह कोकण व विदर्भात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता ही कायम आहे..
३-उघडीप कश्यामुळे?
i)पावसाळी हंगामातील महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील दिड किमी.उंचीपर्यंतचा पुर्वो-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस त्याच्या सरासरी जागेपासून पुन्हा अधिक उत्तरेकडे यू पी राज्याकडे कडे सरकण्याची शक्यता आहे.
व ii)बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व उत्तरप्रदेश कडे सरकण्याच्या शक्यतेतून अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस पावसाचा जोर कमी होवून मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काहीशी उघडीप जाणवणार आहे.
४-आता मध्य महाराष्ट्रात पावसाला पुन्हा कधी सुरवात होवू शकते ?
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील पुढील पाऊस वा पुढील उघडीपी संबंधीचा खुलासा रविवार दि.२ ऑगस्ट (संकष्टचतुर्थी) दरम्यान तयार होण्याऱ्या वातावरणीय प्रणाल्यांच्या निर्मिती शक्यतेच्या आधारावरच खुलासा करता येईल,असे वाटते.
५-भू -जल,धरणे व इतर जलाशये यांच्या पाणी पातळीतील वाढीसंबंधी पुढील खुलासा काय असु शकतो?
जुलै महिन्यातील २ ते ८ व १७ ते २५ जुलै दरम्यान झालेल्या पावसाने धरणे व इतर जलाशयात साठवणीत विशेष नसली तरी काहीशी वाढ झाली आहे. ऑक्टोबर अखेर नक्कीच पाणी पातळीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवरील मंदीचे सावट व देशांतर्गत आव्हाने या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या वळणावर उभी…
नीट पेपरफुटीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या…
भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या…
पारंपरिक तंत्रज्ञानाकडून स्वायत्त सहकाऱ्याकडे होणारी वाटचाल आणि वृत्तगृहातील (Newsroom) आमूलाग्र बदल कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढची उत्क्रांती…
राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात…
विचारांशी तडजोड न करणारे, सत्तेला आणि सनातनी व्यवस्थेलाही निडरपणे प्रश्न विचारणारे डॉ. कुमार सप्तर्षी आज…