Asparagus Medicinal Plant Information
ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये शतावरी वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव – शतावरी
शास्रीय नाव- Asparagus recemosus wild
इतर नावे – शतावरी, श्वेत्मुखी, खादुरसा, शतमुखी, शतपदी
लीलीयासी या कुळातील शतावरी ही वेलवर्गीय औषधी वनस्पती आहे. ही मुळची बर्तातील आहे. शतावरीमध्ये औषधी शतावरी, भाजीची शतावरी आणि शोभेची शतावरी असे बावीस प्रकार आहेत. बारीक शेपूच्या पानासारखी पाने असणारी वेलवर्गीय शतावरी ही औषधात वापरली जाते. हिच्या फांद्यांना बारीक बारीक काटे असतात. हिची फुले पांढरट, गुलाबी, सुवासिक आणि लहान असून मे ते जुलै मध्ये येतात. फळे वाटण्यासारखी पण लहान असून पक्व झाल्यावर तांबडी होतात. शतावरीला खोडापासून जमिनीत दंडाकृती दोन्हीकडे निमुळती होणारी पांढऱ्या रंगाची अनेक मांसलमुळे येतात. मुळांची लांबी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३० ते ६० सेंटीमीटर इतकी असते. भारतात ही वनस्पती सर्वच आढळते.
शतावरीची झाडे उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत असतात. उन्ह्याळ्यात पूस झाल्याबरोबर सुप्त गळ्यांना अंकुर येत आणि वेलीची वाढ झपाट्याने होते. वसंत ऋतूमध्ये बारीक दोन झुपकेदार फुले मंजिरीमध्ये येतात. काही दिवसानंतर वाढण्यापेक्षा लहान आकाराची व पिकल्यावर लाल अशी फळे पहावयास मिळतात. त्यानंतर हिवाळ्यात वेलीच्या फांद्या सुकाव्यास सुरवात होते व कंद खोडून काढावा.
शतावरीची पाने आणि मुळे औषधात वापरतात. मूळ मूत्राशयाच्या रोगावर गुणकारी आहे. तसेच मुतखडा सफेद प्रदर रोग व शुक्रजंतू वाढीसाठी उपयोगी आहे. दुध सुटण्यासाठी आणि भूक वाढविण्यासाठी मुळांचा उपयोग करतात. गर्भाशयातील पिडा कमी करते, शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी, वात, पित्त, कफ रोधक, ताणतणाव, मधुमेह, आतड्यांचे आजार, हार्मोन संतुलन, रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.
शतावरी पिकास समशीतोष्ण व उष्ण हवामान चांगले मानवते. उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते.दोन रोपात ९० सेमी व दोन, तीन, सात फुट अंतर असावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
शतावरी मुलांची १.५ ते २ (साधारण १८ महिने) वर्षांनी करावी. कुदळीने किंवा टिकावाने जमीन खोडून काळजीपूर्वक मुले काढून घ्यावीत. खोडाला २ .३ मुळे ठेऊन परत ती मातीत गाडून ठेवावीत म्हणजे पुढील वर्षी उत्पन्न मुळू शकेल. काढलेल्या मुलावरील माती पाण्याने धुऊन घ्यावी व १० ते १५ सेंटीमीटर लांबीचे तुकडे करावेत. हेक्टरी उत्पादन साधारण १२ ते १५ क्विंटल सुकलेल्या मुळ्या मिळतात.
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…