Ekta Foundation has announced the 2025 state-level literary awards. The awards will be presented at the 8th Ekta Marathi Sahitya Sammelan in Padali, Shirur Kasar.
पाडळीतील संमेलनात होणार वितरण
शिरूर कासार : मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा या उद्देशाने साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाज व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कसलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन कार्यरत असलेल्या एकता फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात.
सन २०२५ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यंदा शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथे होणाऱ्या ८ व्या एकता मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती एकता कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी दिली.
यंदाचे पुरस्कार असे:
कै. विश्वनाथ यादव कराड (गुरुजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार पुणे येथील शरद अत्रे यांच्या ‘जगावेगळी’ आणि अहिल्यानगर येथील गोकुळ गायकवाड यांच्या ‘ताटातूट’ या कथासंग्रहांना विभागून जाहीर झाला आहे.
कै. विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि. पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार बुलढाणा येथील डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या ‘बारूद’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.
स्वा. सै. गणपतराव बडे सार्वजनिक वाचनालय, लोणी (ता. शिरूर कासार, जि. बीड) राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार पिंपरी-चिंचवड येथील आशा नेगी हिरेमठ यांच्या ‘ब्युटी ऑफ लाईफ’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.
कै. काशिनाथ आश्रुबा शिंदे (सर) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘रंगतदार नाट्यछटा’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
कै. वच्छलाबाई बाबासाहेब सानप (आदर्श माता) राज्यस्तरीय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार गोवा येथील मुग्धा बोरकर यांच्या ‘कोलाज’ आणि अकोला येथील डॉ. मोहन खडसे यांच्या ‘गुपित आनंदाचं’ या पुस्तकांना विभागून जाहीर करण्यात आला आहे.
कै. परमेश्वर भागुजी कैतके (लाईनमन) राज्यस्तरीय उत्कृष्ट संशोधन-संपादन साहित्य पुरस्कार धाराशीव येथील डॉ. सौ. रेखा ढगे यांच्या ‘सावित्रीच्या कविता’ या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे.
कै. लताबाई पुरुषोत्तम बारडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार परभणी येथील प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांच्या ‘तुकाराम नीती’ या पुस्तकाला जाहीर झाल्याची माहिती एकता पुरस्कार निवड समितीने दिली आहे.
दरम्यान, कथाकार प्रा. डॉ. भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखालील पुस्तक परीक्षण समितीने या पुरस्कारांसाठी साहित्यकृतींची निवड केली. या समितीत एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे, सातारा जिल्हाध्यक्षा श्रीमती रंजना सानप, युवक प्रदेश निमंत्रक इम्रान शेख, नांदेड जिल्हाध्यक्षा ॲड. सुचिता गिते, द. मा. माने (शिरूर ताजबंद), पाथर्डी तालुकाध्यक्ष राजेंद्र उदारे, लातूर प्रतिनिधी जी. जी. कांबळे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्रदीप बोडखे, तालुका सल्लागार ॲड. प्रताप वाघुंबरे, पाटोदा तालुका सहसचिव बाळासाहेब नागरगोजे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश वाकळे, परभणी जिल्हाध्यक्ष पु. ना. बारडकर, मराठवाडा विभागीय महिला आघाडी प्रमुख प्रा. डॉ. संगीता घुगे आणि विभागीय सचिव अंबादास केदार यांचा समावेश होता.
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…