काय चाललयं अवतीभवती

फाउंड्री उद्योगाला अग्रगण्य स्थान मिळण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

ऑटोमोबाईल उद्योगात जसे पर्यावरण पूरक ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन सीएनजी यांचा वापर होतो. त्याच धर्तीवर फाउंड्री उद्योगाने जर ग्रीन हायड्रोजनचा वापर केला तर त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये कमी येईल तसेच या उद्योगाची आयात आणि निर्यात क्षमता वाढेल.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नागपूरभारतीय उद्योग क्षेत्रामध्ये तसेच फाऊंड्री (धातू ओतण्याच्या उद्योगांमध्ये) अपार शक्यता असून आपण जर निर्यात वाढवली आणि आयात कमी केली तर फाउंड्री उद्योगांमध्ये आपण जगात क्रमांक एकवर राहू. यासाठी फाउंड्री उद्योगाने परंपरागत पेट्रोल, कोळसा अशा इंधनाच्या वापरा ऐवजी पर्यावरण पूरक हायड्रोजन या भविष्यातील इंधनाचा वापर करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेन (आयआयएफ) या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेनचे अध्यक्ष नवनीत अग्रवाल उपस्थित होते.

धातू ओतण्याच्या उद्योगाच्या अर्थात फाउंड्रीच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला होणाऱ्या फायद्याबद्दल त्यांनी उपस्थितांना अवगत केले. त्यांनी यावेळी ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्राची माहिती देताना सांगितले की, 2014 ला ज्या उद्योगाची उलाढाल 12 लाख कोटींची होती ती आता 22 लाख कोटींवर आली असून 6 महिन्यापूर्वीच आपण ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. प्रथम क्रमांकावर अमेरिका तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून पुढील काळात या वाहनउद्योग क्षेत्रात आपल्याला प्रथम क्रमांक गाठायचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. ऑटोमोबाईल उद्योगात जसे पर्यावरण पूरक ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन सीएनजी यांचा वापर होतो. त्याच धर्तीवर फाउंड्री उद्योगाने जर ग्रीन हायड्रोजनचा वापर केला तर त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये कमी येईल तसेच या उद्योगाची आयात आणि निर्यात क्षमता वाढेल.

१९५० मध्ये स्थापन झालेली इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन (आयआयएफ) ही मेटल-कास्टिंग उद्योगाची अखिल भारतीय संघटना आहे आणि फाउंड्री उद्योगाच्या ग्राहकांसाठी आणि पुरवठादारांसाठी एक अग्रगण्य संस्था म्हणून काम करत आहे.

कोलकाता येथे मुख्यालय असलेले आयआयएफचे कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे ४ प्रादेशिक कार्यालये असून चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे ४ उत्कृष्टता केंद्रे कार्यरत आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

6 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

11 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

19 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

20 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago