काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने ग्रामसाहित्य पुरस्कारांची घोषणा

ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे, प्रिती जगझाप , भारती तितरे, संजिव बोरकर यांची निवड

चंद्रपूर – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा देण्यात येणाऱ्या रा. ज. बोढेकर स्मृति ग्रामसाहित्य लेखन पुरस्कारासाठी कवी लक्ष्मण खोब्रागडे ( मुल ), कवयित्री प्रीती जगझाप (बल्लारपूर), कवी संजीव बोरकर ( गडचिरोली ), कवयित्री भारती तितरे ( चामोर्शी ) या चार व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. चारही व्यक्तिंनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे. तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सहभाग आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे.

नुकत्याच झालेल्या परिषदेच्या वार्षिक सभेत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील दरवर्षी नवोदित लेखक-कवींना सदर पुरस्कार देण्यात येत असतो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, सन्मानपत्र, मानवस्त्र आणि ग्रामगीता आहे. या पुरस्काराचे वितरण शाहु महाराज जयंती दिनी येत्या २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात प्रदान करण्यात येणार आहे . तसेच या ठिकाणी ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर यांच्या स्मृती सुगंधाची गुंफण या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या कवींचे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सरचिटणीस अँड. राजेंद्र जेनेकर, विलास उगे, देवराव कोंडेकर, संजय वैद्य, प्राचार्य भाऊ पत्रे, नामदेव गेडकर, नारायण सहारे, डॉ. बानासुरे , यवनाश्व गेडकर आदींनी अभिनंदन केले आहे.

कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे. तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत जुनासुर्ला येथे २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. त्यांचा झाडीबोलीत मोरगाड आणि लिपन हे ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शवणारे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. यश खेचून आणू दारी हा ललीतलेखसंग्रह प्रकाशित आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

AI चा वर्षाव, भावनांचा दुष्काळ; मन पुन्हा हिरवं होईल का?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्षाव होत असताना मानवी भावनांचा दुष्काळ का जाणवतो आहे? तंत्रज्ञानाने आयुष्य अधिक सोयीचे…

4 hours ago

पावसाचा खंड : सोयाबीन व कापूस पिकाचे प्रभावी व्यवस्थापन 🌱 Rain Break: Effective Soybean and Cotton Crop Management

राज्यात पावसाचा खंड लांबल्याने सोयाबीन आणि कापूस पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी पिकांची…

16 hours ago

मनाच्या कवाडांवर साचलेला मळ पुसणार का ? क्षमेचा सुवास देणारे पर्युषण पर्व !

अंतर्मानाची कवाडे आणि क्षमेचा सुवास माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, जग एका क्लिकवर आणले; पण स्वतःच्या…

16 hours ago

कवीने अनुभवाच्या मातीतूनच आपला आवाज शोधला पाहिजे! – डॉ राजेंद्र मुंढे

० दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात;४५ कवींचा सहभाग,० वर्ध्यात शब्दांचा रंगमंच सजला;‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ ०…

1 day ago

सिंधुदुर्गाचा निसर्ग अन् साहित्यिक वारसा प्रेरणादायी : डॉ. श्रीपाद जोशी Sindhudurg nature and literary heritage

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गातील निसर्गसंपदा आणि साहित्यिक वारसा आनंददायी आणि प्रेरणादायी असुन त्यामुळे आपण भारावून गेल्याची भावना…

1 day ago

‘वर्दीतली वैखरी’ – खाकीतील संवेदनशील माणूसपण

खाकी वर्दी दिसली की डोळ्यांसमोर उभा राहतो तो कर्तव्यकठोर पोलीस; पण त्या वर्दीच्या आत धडधडणारे…

1 day ago