रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत गेले आठवडाभर भात लावणीचा उपक्रम राबविण्यात आला. पॉवर टिलरने नांगरणी करणे, भाताची तयार केलेली रोप काढणे, शेतात माजलेले गवत काढणे, गिरिपुष्पाचा पाला टाकणे आणि रोपांची लावणी करणे अशी कामे चालली. या कामात प्रयोग भूमीतील मोठी मुले, माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला.
सलग तीन चार तास चिखलात ओणवे राहून काम करणे नवख्यांसाठी अवघड असते. मात्र मुले, शिक्षक त्यासाठी सरावलेले. संध्याकाळी नदीत डुंबल्यावर सारा शिण जातो. या लावणीसाठी प्रयोगभुमीतर्फे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी पुण्याहून सागर चितळे या कामात सामील झाले. त्यानंतर एक दिवस चिपळूणमधील नेत्रविकार तज्ञ व सायकलीस्ट डॉ. मनिषा वाघमारे त्यांच्या स्नेही निलांबरी खोंड, ज्योती परांजपे, मंजुषा काणे यांच्यासह या कामात सहभागी झाल्या. भात लावणी हा श्रमसोहळा असतो. एक आगळावेगळा अनुभव असतो. या सोहळ्यात शहरातील व्यक्तींना शेतीचा आनंद घेण्याची संधी मिळते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.