आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

– ईशान्य मान्सून
देशात ३० मे २०२४ ला आगमन झालेल्या नैऋृत्य मान्सूनचे १५ ऑक्टोबर ला निर्गमन झाले.
परंतु त्याच दिवसापासून ईशान्य मान्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील ४ राज्यात स्थिरावून आज सोमवार दि.२७ जानेवारीला देशातून निघून गेला.

थंडीची अवस्था –
          गेल्या १० दिवसापासून किमान तापमानातील चढ उतारासहित,  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अश्या २३ जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली तर कोकण, खान्देश, नाशिक नगर, छ.सं नगर अश्या १३ जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही.
        पुढील १० ते १२ दिवस  म्हणजे ६ फेब्रुवारी पर्यन्त किमान तापमानात २ ते ३ डिग्रीने  वाढ होवून थंडी अजुन कमी होण्याची शक्यता जाणवते.
        परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची  गायब झाली असे समजू नये.

पाऊस
                    सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील आठवड्यात, २-३ दिवस, केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता ( १ ते २ मिमी.) पुढील जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जाणवू शकते.
शनिवार दि. १ फेब्रुवारी – लातूर, नांदेड, बीड, सोलापूर जिल्ह्यात,
रविवार दि.२ फेब्रुवारी -कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, सं. नगर, बीड, जालना, अकोला, बुलढाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात
बुधवार दि.५ फेब्रुवारी- लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर,  वर्धा, नागपूर जिल्ह्यात

कश्यामुळे ही वातावरणीय स्थिती?
                   सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती जाणवत आहे. शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंब वर्तुळकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे  विदर्भ मराठवाड्यासहित संपूर्ण उत्तर अर्ध महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात असल्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे.
                  हेच प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेंव्हा  बं. उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेमुळे व वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील वर स्पष्टीत जिल्ह्यात व परिसरात १,२, ५ फेब्रुवारी ला ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

4 hours ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

5 hours ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

1 day ago

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

2 days ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

2 days ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

2 days ago