February 19, 2025
Northeast monsoon leaves the country
Home »   ईशान्य मान्सूनचे देशातून प्रयाण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

  ईशान्य मान्सूनचे देशातून प्रयाण

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

– ईशान्य मान्सून –
देशात ३० मे २०२४ ला आगमन झालेल्या नैऋृत्य मान्सूनचे १५ ऑक्टोबर ला निर्गमन झाले.
परंतु त्याच दिवसापासून ईशान्य मान्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील ४ राज्यात स्थिरावून आज सोमवार दि.२७ जानेवारीला देशातून निघून गेला.

थंडीची अवस्था –
          गेल्या १० दिवसापासून किमान तापमानातील चढ उतारासहित,  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अश्या २३ जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली तर कोकण, खान्देश, नाशिक नगर, छ.सं नगर अश्या १३ जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही.
        पुढील १० ते १२ दिवस  म्हणजे ६ फेब्रुवारी पर्यन्त किमान तापमानात २ ते ३ डिग्रीने  वाढ होवून थंडी अजुन कमी होण्याची शक्यता जाणवते.
        परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची  गायब झाली असे समजू नये.

पाऊस –
                    सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील आठवड्यात, २-३ दिवस, केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता ( १ ते २ मिमी.) पुढील जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जाणवू शकते.
शनिवार दि. १ फेब्रुवारी – लातूर, नांदेड, बीड, सोलापूर जिल्ह्यात,
रविवार दि.२ फेब्रुवारी -कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, सं. नगर, बीड, जालना, अकोला, बुलढाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात
बुधवार दि.५ फेब्रुवारी- लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर,  वर्धा, नागपूर जिल्ह्यात

कश्यामुळे ही वातावरणीय स्थिती?
                   सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती जाणवत आहे. शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंब वर्तुळकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे  विदर्भ मराठवाड्यासहित संपूर्ण उत्तर अर्ध महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात असल्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे.
                  हेच प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेंव्हा  बं. उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेमुळे व वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील वर स्पष्टीत जिल्ह्यात व परिसरात १,२, ५ फेब्रुवारी ला ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading