शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी मधमाशी मित्रांची तुकडी तयार – राहुल रेखावार

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी जिल्ह्यात मधमाशी मित्रांची तुकडी तयार
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मध, रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ आणि ‘रेशमाचे गाव’ उपक्रम

कोल्हापूर – मधमाशांना हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 25 मधमाशी मित्रांची तुकडी तयार झाली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार काढून मधमाशी मित्र तयार करण्यासाठीची ही कार्यशाळा देशातील अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाबार्ड व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी मित्र प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थीना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मधमाशी मित्र प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक अधिकराव जाधव, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण अनुसंधान विभागाचे सहायक संचालक सुनील पोखरे, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी आदी उपस्थित होते.

मध आणि रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मधाचे गाव आणि रेशमाचे गाव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित ही प्रशिक्षण कार्यशाळा मधमाशा जतन व संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मधमाशांना हानी न पोहोचवता, मधमाशांचे संवर्धन करत पर्यावरणपूरक पद्धतीने मध संकलन करण्याची माहिती देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेतील महिलांचा सहभाग कौतुकास्पद बाब आहे. यातून शेतकऱ्यांचा मध उद्योगाच्या जोडधंद्यातून विकास साधण्यास मदत होईल.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. श्री. पोखरे यांनी हा उपक्रम देशातील अभिनव उपक्रम असून कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील आग्या मधमाशांचे पोळे पर्यावरण पूरक पद्धतीने काढून मधमाशी मित्र कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. एस.एन.सपली, संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कविता ओझा व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मधमाशी मित्र मोहन कदम, ज्ञानेश्वर पाटील व संजय घोरपडे यांनी हे प्रात्यक्षिक करुन दाखवले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यांपासून लाखोंचा उद्योग ! एक्सट्रुजन तंत्रज्ञान बदलणार ग्रामीण उद्योजकतेचे चित्र ? From grains to a multi-million dollar industry

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका किंवा हरभरा… या पारंपरिक पिकांपासून आधुनिक, पौष्टिक आणि बाजारपेठेत मोठी मागणी…

10 hours ago

राजर्षी असो वा ब्राह्मण…मोक्षाचा खरा मार्ग कोणता? Whether a King sage or a Brahmin…what is the true path to salvation?

जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या…

1 day ago

साखरेचा गोडवा वाढणार ? महाराष्ट्रात ऊस उत्पादनाने गाठला नवा टप्पा

महाराष्ट्रातील ऊस लागवड क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यांचा तपशील क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये), उत्पादन (लाख टनांमध्ये)…

1 day ago

लोकमान्य टिळक : स्वराज्याचा घोष आणि ज्ञानाचा अखंड दीपस्तंभ Lokmanya Tilak: The Voice of Swaraj

आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिवस आणि एक ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे.'स्वराज्य हा माझा…

1 day ago

शिवकालीन जलनितीचा गोव्यातील सेतू Water Managment in Shivaji’s Era Book in Konkani

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सर्वश्रुत आहे; मात्र त्यांच्या दूरदर्शी जलनितीची चर्चा तुलनेने कमी होते.…

2 days ago

स्थावर मिळकत क्षेत्रात अदानींचा अभूतपूर्व उदय ! या बाबतचा विशेष आर्थिक लेख Adani’s unprecedented rise in the real estate sector

जागतिक पातळीवरील मंदीचे सावट व देशांतर्गत आव्हाने या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या वळणावर उभी…

2 days ago