काय चाललयं अवतीभवती

बलवडी येथे रविवारी ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

  • विजय चोरमारे संमेलनाध्यक्ष ;
  • उद्घाटक डॉ. बाबासाहेब देशमुख ;
  • विठ्ठल साळुंखे स्वागताध्यक्ष

विटा : बलवडी भा. ( ता‌. खानापूर ) येथील जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ( ता. २५ ) ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. पत्रकार विजय चोरमारे संमेलनाध्यक्ष आहेत. पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संयोजक अॅड. सतीश लोखंडे यांनी दिली.

संमेलन तीन सत्रात होणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे ( पुणे ) विचार मंचावर संमेलन होईल. पहिले सत्र सकाळी दहा वाजता सुरू होईल.‌ जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडीचे सदस्य डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे.

शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे स्वागताध्यक्ष आहेत. ऊसकोंडी कांदबरीचे लेखक डॉ. श्रीकांत पाटील ( घुणकी ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शाहिर बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जोर्तिलिंग वाड:मय पुरस्काराने शाहिर बजरंग आंबी, डॉ. एच. के. पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शेतकरी पुरस्कार मानसिंग जाधव ( जाधवनगर ) , श्रीमती इंदूमती आनंदराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शारदा नानासाहेब साळुंखे यांना आदर्श माता पुरस्कार, मारुती मलू जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार ऋषिकेश तांबडे ( कार्वे ), भि. रा. पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार सिकंदर मोमीन ( भाळवणी ), सदानंद कदम ( सांगली ), रमजान मुल्ला ( नागठाणे ) विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

भारतीय संविधान आणि ग्रामीण साहित्य याविषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. डॉ. सुभाष वाघमारे ( सातारा ) अध्यक्ष आहेत. विजय मांडके ( सातारा ) वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात जयवंत आवटे ( कुंडल ) यांचे कथाकथन होईल. तिसऱ्या सत्रात कवी इंद्रजीत घुले ( मंगळवेढा ) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

4 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

13 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago