August 21, 2025
Sahityakana Foundation Sahitya Award Nashik
Home » साहित्यकणा फाउंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशन संस्थेने विविध पुरस्कार देण्याचे योजिले आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे यांनी दिली आहे.

कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रहासाठी सुमनताई पंचभाई स्मृती पुरस्कार, कथा संग्रहास मीराबाई गोराडे स्मृती पुरस्कार, कादंबरीसाठी शिलाताई गहिलोत-राजपूत पुरस्कार, बालसाहित्यासाठी डॉ. राहुल पाटील स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम १००१ रुपये व सन्मान चिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.

ज्या कवी अथवा लेखकांचे ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी) या साहित्य प्रकारात पुस्तक प्रकाशित झालेले आहे अशा कवी अथवा लेखकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रकाशित पुस्तकाच्या दोन-दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर ०५ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन साहित्यकणा फाऊंडेशनने केले आहे.

साहित्य पाठवण्यासाठी पत्ता असा – विलास पंचभाई (सचिव), साइसिद्धी अपार्टमेंट, प्लॅट नं – ५, विनायकनगर, टी. बी. सॅनिटरियमजवळ, देवधर कॉलेज समोर, मेरी, दिंडोरीरोड, नाशिक – ४२२००१. अधिक माहितीसाठी संपर्क – ७७७४९५५८९२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading