मुक्त संवाद

कविता म्हणजे राजकीय कृती ! ‘साक्षात’ कार्यक्रमात रंगली विचारांची ठिणगी

संभाजीनगर ‘साक्षात’ मधील लक्षवेधी साक्षात वृत्तांत !

आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण निखळ माणूस म्हणून जगणारा डावाच असतो. आणि छुपा डावा भविष्यात उजवा म्हणूनच उघडा पडत असतो. लेखक कवीला राजकारणाची समज नसेल तर त्याला सांस्कृतिक अंडर करंटही डोळसपणे शोधता येणार नाही. कवीची कविता म्हणजेच राजकीय कृती असते.

अजय कांडर

एखाद्या कार्यक्रमासाठी आपण जातो तेव्हा कार्यक्रम आयोजकांची कार्यक्रमासंदर्भातील शिस्त, त्यांची एकूणच साहित्याची समज निमंत्रित वक्त्यालाही बोलण्याची प्रेरणा देत असते. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ‘साक्षात ‘ कार्यक्रमात बोलताना पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता आला; याचं कारण या कार्यक्रमाच्या आयोजकांनी दाखवलेल आपलेपण आणि समाज साहित्य राजकारण या अनुषंगाने परखडपणे बोलण्याचे दिलेले स्वातंत्र्य बाकी मी जे काही बोललो ते पुढील काळात कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील , प्रा. दादा गोरे आणि आणि आमचे मित्र प्रा. रामचंद्र काळुंखे आणि प्रा. हंसराज जाधव यांच्या कल्पनेनुसार एखाद्या नियतकालिकात विस्ताराने प्रसिद्ध होईलच.

मात्र कवी लेखन करतो म्हणजे काय करतो ? कवीची निर्मिती केंद्रे, समकालीन वाड्मयीन संस्कृती, पुरस्कार संस्कृती, साहित्यातील अपप्रवृत्ती, या मुद्यांचा उहापोह केला. आणि कवी लेखकाला लेखन करताना सांस्कृतिक राजकारणच करावं लागतं. साहित्यातील गट तट ही फार संधीसाधू गोष्ट असून जात धर्म हे सगळ नाकारून डावे / उजवे या सगळ्या पलीकडे जाऊन निखळ माणूस म्हणून जगू पाहणारच उत्तम साहित्य निर्मिती करू शकतो.

या संदर्भात आपल्याला कवी पाश याचे उदाहरण देता येईल. त्याच बरोबर आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण निखळ माणूस म्हणून जगणारा डावाच असतो. आणि छुपा डावा भविष्यात उजवा म्हणूनच उघडा पडत असतो. लेखक कवीला राजकारणाची समज नसेल तर त्याला सांस्कृतिक अंडर करंटही डोळसपणे शोधता येणार नाही.
कवीची कविता म्हणजेच राजकीय कृती असते. करूणेचा धागा बांधन्यासाठीच कविता लिहायची असते. आपला इतिहास आपल्याला नीट माहीत असायला हवा. इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी त्यांनी लिहिलेले बुद्ध चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ठेवले आणि बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. या भूमीतून मी लिहितो आहे याचं भान मला सतत असायला हवं.

साहित्यात जातीनुसार, धर्मानुसार, प्रदेशानुसार भक्तांची मांदियाळी वाढली.मात्र कविता प्रांत भाषा धर्म प्रदेश ओलांडून निरंतर वाहत असते असे कथन केले त्याला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि प्रश्नोत्तराच्या काळात तर ते या सगळ्यावर उत्तम चर्चा झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले गेली तीस वर्ष मराठीतील प्रसिद्ध नाटककार लेखक कवी यांना निमंत्रित करून साक्षात कार्यक्रम केला जातो. मात्र तीस वर्षात हा आजचा कार्यक्रम सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो आम्ही निमंत्रित केलेल्या वक्त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन मांडलेल्या विचारांमुळेच ! त्यामुळे आता तीस वर्षांनी हा कार्यक्रम बंद करावा असं वाटत असताना अजून काही काळ हा कार्यक्रम करण्याची उर्मी वाढली आहे.

कार्यक्रमाला कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, हंसराज जाधव, यांच्यासह दासू वैद्य, बाबा भांड, शाहू पाटोळे, ऋषिकेश कांबळे, गणेश मोहिते, राहुल कोसंबी, प्रमिला नारायण, सुधाकर शेंडगे, श्रीधर नांदेडकर, कैलास अंभुरे, वाल्मिकी वाघमारे, रवी कोरडे, सुनील उबाळे, जिजा शिंदे, प्रशांत गौतम, गणेश घुले, के एस अतकरे, विशाल तायडे, मनोज खुटे,विष्णू सुराशे, प्रमिला मुखेडकर, प्रिया धारूरकर,हबीब भंडारे, प्रकाश चोरघडे असे अनेक प्रतिष्ठित साहित्यिक उपस्थित होते.

एकंदरीत कणकवली ते संभाजीनगर असा सलग 14 तास प्रवास करून गेलेला वेळ वाया गेला नाही एवढं निश्चित म्हणता येईल!

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

6 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

22 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

3 days ago