विश्वाचे आर्त

विचारांच्या डोळ्यांनी पाहणे अन् अनुभवणे

विचारांना सुद्धा दृष्टी असते. ती दृष्टी सुद्धा चांगले विचार, वाईट विचार हे ओळखू शकते. म्हणजे विचारांच्या या दृष्टीचे कार्य कसे चालते हे जाणून घ्यायला हवे. या दृष्टीचा अनुभव घ्यायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ऐसे विचाराचा डोळां । तिन्हीं गुण हे वेगवेगळां ।
दाविले जैसा आंवळा । तळहातींचा ।। 268 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – तळहातावरील आंवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा, त्याप्रमाणे हे तिन्ही गुण विचारांच्या डोळ्यांना दिसतील असे दाखविले.

आपल्या मनात एखादा विचार आला की त्यानंतर त्याप्रमाणे आपण आपली कृती करतो. म्हणजेच आपल्या मनात तो विचार उत्पन्न होता तेंव्हाच आपणाकडून कृती होते. मनात उत्पन्न होणारे विचार शुद्ध असतील याची काळजी आपण घेतल्यास निश्चितच आपली सात्विक वृत्ती वाढेल. यासाठी मनात येणाऱ्या विचारावर नियंत्रण मिळवायला हवे. सदैव मनात चांगले विचार कसे उत्पन्न होतील याकडे लक्ष द्यायला हवे. मनाला अशुद्ध विचाराचा वासही लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. म्हणजेच मन सैदव चांगल्या विचारात गुंतवायला हवे. चांगल्या संगतील राहील्यास निश्चितच त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ शकतो.

विचारांना सुद्धा दृष्टी असते. ती दृष्टी सुद्धा चांगले विचार, वाईट विचार हे ओळखू शकते. म्हणजे विचारांच्या या दृष्टीचे कार्य कसे चालते हे जाणून घ्यायला हवे. या दृष्टीचा अनुभव घ्यायला हवा. आपण गाडी किंवा सायकल चालवत असतो तेव्हा अचानक कोणी समोर आले की आपोआपच आपला हात ब्रेकवर जातो. आपल्या मनात त्यावेळी अनेक विचार सुरु असतात, पण मन त्यात गुंतलेले नसते. म्हणजे विचारांच्या दृष्टीमुळे आपण ब्रेक लावतो. जर मन वेगळ्या विचारात गुंतलेले असेल आणि त्यातून आपण भानावर नाही आलो तर निश्चितच अपघात होतो. म्हणजे मन तिथे नसले तरी विचारांच्या दृष्टीमुळे ब्रेक दाबण्याची कृती घडते.

संगणकावर टाईप करताना आपली बोटे किबोर्डवर असतात. आपल्या मनात जे येते ते आपण टाईप करतो. पण कसे ? कारण तो किबोर्ड आपल्या मेंदूत साठवलेला असतो. मेंदूला चालणा दिल्यानंतर त्यातून जे प्रकट होते त्यानुसार किबोर्डवर आपली बोटे चालतात व त्यानुसार आपोआप शब्द उमटत जातात. मेंदूत किबोर्ड साठवलेला नसेल तर विचाऱ्यांच्या डोळ्याला तो पाहाता येणार नाही. म्हणजेच आपल्याकडून ती कृती होणार नाही. मेंदूत साठवलेला किबोर्ड विचाऱ्यांच्या डोळ्यांनी आपण तो पाहातो त्यावेळी आपली नजर किबोर्डवर नसली तरीही शब्द मात्र आपोआपच हवे तेच टाईप केले जात असतात. कारण सर्व किबोर्ड हा आपल्या मेंदूत साठवलेला असतो. तो साठवलेला नसेल तर आपण तो शोधत बसून टाईप करावे लागले असते. साठवलेले संदर्भ विचारांच्या डोळ्यांनी पाहीले नाहीत तर आपणास हवे असणारे विचार उमटणार नाहीत. म्हणजेच आपणाकडून योग्य ती कृती होणार नाही.

साधना करताना विचाऱ्यांच्या डोळ्याने सोहमचा स्वर अनुभवायचा आहे. त्या विचारात तो स्वर साठवायचा आहे. साधनेत निर्माण होणारे सात्विक, राजस, तामस भाव या विचारांच्या डोळ्यांनी पाहायचे असतात. अनुभवायचे असतात. पण यातून कोणताही भाव प्रकट करायचा नसतो तर तो फक्त अनुभवायचा असतो. त्यात गुंतून मात्र राहायचे नाही. या तिन्ही भावांचे अनुभवने जेव्हा संपते तेव्हा मग सोहमच्या स्वराचा नित्य अनुभव आपणास होऊ लागतो. त्या नित्यतेतूनच मग आपोआपच आत्मज्ञानाचा लाभ होतो. यासाठी ही प्रक्रिया समजून घेणे तसेच अनुभवने हे महत्त्वाचे आहे. विचारांना सुद्धा डोळे असतात हे समजून घेणे हे यासाठीच गरजेचे आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

मानवी मनाची सुंदरता टिपणारा भावविभोर कवितासंग्रह : निळी सावळी नव्हाळी Review of Nili Savali Navali Poetry Collection

प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी…

36 minutes ago

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

22 hours ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

24 hours ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

1 day ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

2 days ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 days ago