काय चाललयं अवतीभवती

SIAC मुंबईतर्फे UPSC मुलाखतीसाठी निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम

२९ नोव्हेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज पाठवण्याचे आवाहन

मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ चा निकाल ११ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबईतर्फे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम तसेच Quality Enrichment Programme चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी या निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

या विशेष प्रशिक्षणातून उमेदवारांना UPSC मुलाखतीसाठी आवश्यक असणारी व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, विषयांची सखोल तयारी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण, प्रशासनिक दृष्टिकोन आणि संवादकौशल्य यांसह सर्वांगीण मार्गदर्शन दिले जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबर २०२५ पूर्वी 📧 siac.cet2025@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवावेत.

नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती व सूचना पाहण्यासाठी 🌐 www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच कोणत्याही शंका, माहितीसाठी 📞 ०२२-२२०७०९४२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

2 hours ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

17 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

2 days ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

3 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

3 days ago