२९ नोव्हेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज पाठवण्याचे आवाहन
मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ चा निकाल ११ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबईतर्फे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम तसेच Quality Enrichment Programme चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी या निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या विशेष प्रशिक्षणातून उमेदवारांना UPSC मुलाखतीसाठी आवश्यक असणारी व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, विषयांची सखोल तयारी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण, प्रशासनिक दृष्टिकोन आणि संवादकौशल्य यांसह सर्वांगीण मार्गदर्शन दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबर २०२५ पूर्वी 📧 siac.cet2025@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवावेत.
नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती व सूचना पाहण्यासाठी 🌐 www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच कोणत्याही शंका, माहितीसाठी 📞 ०२२-२२०७०९४२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
