विश्वाचे आर्त

मन साधनेत रमण्यासाठी हे करा

सद्गुरु यासाठीच आपले कान मागतात. कारण कानाने तो गुरुमंत्र ऐकायचा असतो. जपाचा, मंत्राचा तो स्वर स्वतःच्याच कानाने ऐकण्याचा प्रयत्न केल्यास साधना निश्चितच फलद्रुप होते. साधनेत आपोआपच मन गुंतून राहाते. कानाला मंत्राचा स्वर ऐकण्याची सवय लावायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

परि तुवा येतुले करावे । मागौनि ते आम्हां देयावे ।
जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा ।। 954 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – परंतु तूं मात्र येवढें कर कीं, आम्ही तुझ्याजवळ जे मागू. तें तूं आम्हांला दिले पाहिजेस. तें मागणें हें की तूं आपल्या स्वतःस कानाचें नाव ठेव. इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवुन फक्त ऐकण्याचें काम चालूं दे.

गुरुमंत्र कानात सांगितला जातो. म्हणजे तो निट लक्ष देऊन कानांनी ऐकायचा असतो. साधना आपण करतो पण साधनेत आपले लक्ष असतेच असे नाही. साधनेत लक्ष लागत नाही हा सर्वांचाच प्रश्न असतो. साधनेला आपण व्यवस्थित आसन करून बसलेले असतो खरे पण लक्ष मात्र दुसरीकडे असते. जपाची माळ पुढे पुढे सरकत असते. जप सुरु असतो पण लक्ष मात्र इतरत्र भटकत असते. आजच्या घडामोडींचा परिणाम त्यावर झालेला असतो. एखादी वाईट घटना घडली असेल तर तिच डोळ्या समोर उभी राहाते. त्याने काय केले. आपण काय केले. असे घडलेल्या घडणांचे विचारचक्र सुरु असते. अशाने साधनेचे उद्दिष्ट कसे साध्य होईल.

याचाच अर्थ मनात येणारे विचार हे थांबायला हवेत. ते थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा. पण त्या पयत्नाना यश येतेच असे नाही. कारण कोणतीही गोष्ट मारून मुरकुटून होत नाही. अशावेळी उलटी क्रिया करून पाहायला हवी. मन इतरत्र दुसऱ्या गोष्टीत गुंतवायला हवे. म्हणजेच साधनेत मन गुंतवण्याचा प्रयत्न करायला हवा. मनात सातत्याने साधनेचा विचार घोळावा असा प्रयत्न करायला हवा. म्हणजेच विषय विचारापासून मन दूर न्यायला हवे. असे करता आले तर मन निश्चितच साधनेत एकाग्र होऊ शकते.

सद्गुरु यासाठीच आपले कान मागतात. कारण कानाने तो गुरुमंत्र ऐकायचा असतो. जपाचा, मंत्राचा तो स्वर स्वतःच्याच कानाने ऐकण्याचा प्रयत्न केल्यास साधना निश्चितच फलद्रुप होते. साधनेत आपोआपच मन गुंतून राहाते. कानाला मंत्राचा स्वर ऐकण्याची सवय लावायला हवी. असे झाल्यास मन आपोआपच साधनेत रममान होईल. स्वर ऐकण्याची सवय झाल्यास एकाग्रता वाढून आत्मज्ञानाची अनुभूती येते. आत्म्याचे ज्ञान होते. मी कोण आहे याचा बोध होतो. यासाठी इतर सर्व इंद्रियांचे व्यवहार बंद करून मन कानावर ठेवायला हवे. मनाने व कानाने साधनेचा स्वर ऐकण्याची सवय लावायला हवी. हे एकदम शक्य होणार नाही. पण अभ्यासाने या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रयत्न करत राहील्यास यश निश्चितच येते. हळूहळू साधनेची आपणास सवय जडते. मग मन साधनेत रमावावे लागत नाही तर मन आपोआपच साधनेत रमते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

9 hours ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

10 hours ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

20 hours ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

22 hours ago

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

1 day ago