मुक्त संवाद

संस्कार कथांचा संग्रह – बाबांची सायकल

मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा कथासंग्रह – बाबांची सायकल

मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक पात्रे, समायोचित घटना प्रसंग सुंदर संवाद ही या कथांची वैशिष्ट्ये आहेत. गुलाब बिसेन यांच्या या सर्वच कथा बोध करणाऱ्या संस्कार कथा आहेत.

मुलांना आनंद देणे आणि त्यांना बोधप्रद अशी शिकवण देणे या हेतूने मराठीत आजपर्यंत बालसाहित्य लिहिले गेले आहे. परिकथा, चातुर्यकथा, चिऊकाऊच्या कथा, राजा राणीच्या कथा त्यांनी आजपर्यंत मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातलेली आहे. अलीकडे मुलांच्या भावविश्वातील घटना घडामोडींचा वेध बालसाहित्यातून घेतला जात आहे. आपल्या अवतीभवतीचे विषय कथा कवितेत आल्यामुळे मुलांनाही याचे विशेष आवड निर्माण झाल्याचे दिसून येते. हाच धागा पकडून गुलाब बिसेन यांनी बाबांची सायकल आणि इतर कथा हा बालकथा संग्रह लिहिला आहे.

करील मनोरंजन जो मुलांचे |
नाते जडेल प्रभुशी तयाचे ||
याच पद्यपंक्तीला प्रमाण मानून मुलांचे मनोरंजन आणि त्याचबरोबर प्रबोधन करण्याचे काम तसेच त्यांच्या भावविश्वाला साद घालण्याचे काम यातील कथा करताना दिसतात. चोरून चिंचा खाणाऱ्या मुलांना वेगळी शिक्षा देणारे गुरुजी हिरवी शिक्षा या कथेमध्ये भेटतात. मुलांनी फळांच्या बिया जमा करायच्या आणि पावसाळ्यात त्यांची लागवड करायची असा शिक्षेचा एक उपक्रम ते राबवतात आणि मुलांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणतात. खऱ्या अर्थाने मुलांना निसर्ग शिक्षण देतात. तर पाणी बचतीचा संदेश देणारी पाणीपंचमी ही कथा खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे मुलांना शिक्षण देणारी आहे.

बाबांची सायकल ही शीर्षक कथा खूपच लक्षवेधी आहे. सायकल चोरीला गेल्यामुळे वडिलांचे होणारे हाल पाहून कथेतील मुलगी शिष्यवृत्ती परीक्षेतील मिळालेले बक्षीस आपण वडिलांना सायकल घेऊन देते. तर डफली वादन करणाऱ्या आपल्या गुरूंचा अपघात झाल्याने शाळेच्या लेझीम पथकाची गैरसोय टाळण्यासाठी हिरू हा कथेचा नायक डफलीवादन करतो व हिरो ठरतो. तर मंग्या कथेतील सगळ्यांच्या थट्टेचा विषय असणारा नायक हा गुरुजींच्या दृष्टीने हिरो ठरतो. त्याचे कारण असे त्याच्या पिशवीतील खेकडा मुलांना दाखवून गुरुजी परिसर अभ्यास शिकवतात. गुरुजींच्या परीक्षेत मंग्या केवळ पास होत नाही तर गुरुजींच्या कौतुकास पात्र ठरतो.

हसऱ्या बिया या कथेतील बबीचा पर्यावरण विषयक दृष्टिकोण लेखकाने खूप छान टिपला आहे. तिच्या दप्तरात सापडलेल्या सिताफळाच्या बिया बाई कचरा समजतात. पण पुढे चार वर्षांनी तिच मुलगी बाईंना पिशवी भरून सीताफळे आणून देते. तेव्हा बाई त्याच्या बिया बबीला परत करतात. कधी कधी मुले सुद्धा शिक्षकांना आपल्या कृतीतून शिकवतात याचे उत्तम उदाहरण आहे.

फुलझाड ही बोधप्रद रूपक कथा आहे. अहंकाराचे बाजार झालेले झाड रुसते आणि एकाकी राहते. त्याला गर्वाची बाधा होते. त्यामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा येतो. वेळेवर चूक सुधारून घेतली पाहिजे हा संदेश ही कथा देते. तर छोटा संशोधक या कथेत शास्त्रज्ञ व्हायचे या कल्पनेने झपाटलेला नायक विनय आपल्याला भेटतो. तर रेनकोट या कथेत गरीब आणि श्रीमंत मुलांच्या परिस्थितीच्या जाणीवा लेखकाने व्यक्त केल्या आहेत.

मुलांना शिक्षणाबरोबर निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख करून देणे. त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे. त्यांच्यावरती उत्तमोत्तम संस्कार करणे. त्यांना बोध देणे व त्यांची जाणीव जागृती करणे अशी काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच गुलाब बिसेन यांचे कथालेखन झाल्याचे दिसून येते. साधी सोपी आकलन सुलभ भाषा हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. सशक्त आणि समृद्ध अशी कथासूत्रे यामध्ये आहेत. मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक पात्रे, समायोचित घटना प्रसंग सुंदर संवाद ही या कथांची वैशिष्ट्ये आहेत. गुलाब बिसेन यांच्या या सर्वच कथा बोध करणाऱ्या संस्कार कथा आहेत.

पुस्तकाचे नाव – बाबांची सायकल आणि इतर कथा
लेखकगुलाब बिसेन
प्रकाशकजेके मिडिया, ठाणे
पृष्ठे – ६२
मुल्य – १००/- रू

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

11 hours ago

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

1 day ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

1 day ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

2 days ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

2 days ago